• Fri. Mar 13th, 2026
    वादळी पावसाच्या तडाख्यानंतरही महाराष्ट्राची साखर गोडच; उत्पादनात देशात टॉपला, काय सांगते आकडेवारी?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘एल निनो’चा प्रभाव आणि वादळी पावसाच्या तडाख्यानंतरही साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. राज्यात १५ डिसेंबरपर्यंत २४.८५ लाख टन (२४८ क्विंटल) साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात १९१ साखर कारखाने कार्यरत असून, त्यांनी आतापर्यंत २९६ लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत १९६ कारखान्यांनी ३६२ लाख टन उसाचे गाळप केले होते. परिणामी ऊस गाळपात महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे.

    उत्तर प्रदेश, कर्नाटकाचीही गती कायम महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश व कर्नाटक या राज्यात ऊस गाळप व साखर उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या राज्यांनी यंदाही आपली गती कायम राखली आहे. डिसेंबरच्या मध्यावधीपर्यंत उत्तर प्रदेशात २२.६५ लाख टन, तर कर्नाटकात १७.५० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

    ४०० लाख मेट्रिक टन साठा, तरीही निर्यातबंदी! तांदूळ उत्पादकांसह उद्योजक संकटात, नेमकं काय घडतंय?
    उत्तर प्रदेशात २४३ लाख टन, तर कर्नाटकात २११ लाख टनाचे ऊस गाळप पूर्ण झाले आहे. ७४ लाख टन साखरउत्पादन देशात १५ डिसेंबरपर्यंत ७४.३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गत साखर वर्षांत (२०२२-२३) या तारखेपर्यंत ८१.८० लक्ष टन साखरेचे उत्पादन झाले होते. सध्या देशातील बारा राज्यांतील ४९९ साखर कारखाने कार्यरत असून त्यांनी ८५७.०४ लाख टन उसाचे गळीत केले आहे. गतवर्षी या तारखेपर्यंत ९२४.३३ लाख टन ऊस गाळप झाले होते. यंदाच्या साखर हंगामाअखेर देशभरात २९१.५० लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त

    केला आहे. थंडी वाढवणार साखर उतारा देशात पंधरा डिसेंबरपर्यंत साखरेचा सरासरी उतारा ८.६७ टक्के एवढा असून, त्यामध्ये उत्तर प्रदेशाने बाजी मारली आहे. उत्तर प्रदेशात साखरेचा सरासरी उतारा ९.३० टक्के मिळाला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed