Maharashtra Rain Update News : उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उजनी व वीर धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे. चंद्रभागा नदीपात्रातून सायंकाळी ५ वाजता १ लाख ५ हजार ९७ क्यूसेक्सने पाण्याचा प्रवाह सुरू असून चंद्रभागा नदीने पाण्याची इशारा पातळी ओलांडली आहे.
गोव्यामध्ये अजूनही पावसाची तूट
बंगालच्या उपसागरातील प्रणालींचा फायदा मध्य महाराष्ट्राला सर्वाधिक झाला असून मध्य महाराष्ट्रात ७२ टक्के अतिरिक्त पाऊस झाला. कोकण-गोवा विभागात ३३ टक्के अधिक पाऊस नोंदला गेला. गोव्यामध्ये अजूनही पावसाची तूट असल्याने या तुटीचा परिणाम कोकण-गोवा विभागाच्या आकडेवारीवर झाला आहे अन्यथा कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग वगळता इतर जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये मुंबई शहर आणि उपनगरांसह, पालघर जिल्ह्याचाही समावेश होतो. पालघरमध्ये सरासरीपेक्षा ६१ टक्के अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. विदर्भात २१ टक्के, तर मराठवाड्यात १७ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील चारही विभागांमध्ये जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे दिसत आहे.
Mumbai News : मुंबईकरांनो जरा जपून! तुमच्यावर आता CCTVची करडी नजर, एक चूक करताच कारवाई होणार; आयुक्तांचे कडक आदेश
कुठे किती पाऊस?
राज्यात नाशिक जिल्ह्याला जुलैच्या पावसाने फायदा झाला. नाशिक जिल्ह्यात सरासरी २९४.५ मिलीमीटर पावसाच्या तुलनेत ७९०.८ मिलीमीटर पाऊस झाला. तो १६९ टक्के अधिक आहे. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात १२९ टक्के, पालघरमध्ये १२४ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली. मुंबई उपनगरात ७४ टक्के, मुंबई शहरात ६० टक्के, रायगडमध्ये ५७ टक्के, ठाणे जिल्ह्यात ५३ टक्के, धुळे जिल्ह्यामध्ये ५३ टक्के, जळगावमध्ये ४९ टक्के आणि अहिल्यानगरमध्ये ४८ टक्के अधिक पाऊस झाला. यामुळे धरण क्षेत्रालाही फायदा झाल्याचे दिसते.
Tukaram Mundhe : एआय वाईट नाही, पण वापरावर यश अवलंबून; तुकाराम मुंढेंचा सल्ला, सोशल मीडियावर दिसतं म्हणून प्रत्येक रील खरं नसतं
६ ते १३ ऑगस्टपर्यंत कमी पर्जन्यमान?
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला असला, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उणे २७ टक्के, नंदुरबार जिल्ह्यात उणे २३ टक्के पाऊस नोंदला गेल्याने या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाची लक्षणीय तूट कायम राहिली. यासोबतच सोलापूर १७ टक्के, बीड सहा टक्के आणि हिंगोलीमध्ये ५ टक्के तूट नोंदली गेली. सहा ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत पश्चिम विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग, तसेच उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग येथे पावसाचे सातत्य राहू शकते. त्यामुळे पावसाची ही स्थिती आणखी सुधारेल, अशी शक्यता आहे. सहा ते १३ ऑगस्ट या काळात मात्र कोकण, विदर्भ येथे सरासरीहून कमी पाऊसमानाची शक्यता आहे.
