• Mon. Aug 3rd, 2026
    Maharashtra Rain : जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज

    Maharashtra Rain Update News : उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उजनी व वीर धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे. चंद्रभागा नदीपात्रातून सायंकाळी ५ वाजता १ लाख ५ हजार ९७ क्यूसेक्सने पाण्याचा प्रवाह सुरू असून चंद्रभागा नदीने पाण्याची इशारा पातळी ओलांडली आहे.

    महाराष्ट्र पाऊस बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘एल निनो’च्या काळात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या प्रणालींनी यंदा राज्याला, तसेच धरणक्षेत्रालाही दिलासा दिला आहे. जूनमध्ये राज्याच्या अनेक भागांत मान्सूनने निराशा केल्यानंतर जुलै महिन्यात मात्र पावसाने जोरदार पुनरागमन केले. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, १ ते ३१ जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या तुलनेत ४० टक्के अधिक पावसाची नोंद झाली. राज्यात सरासरी ३२४.२ मिलीमीटर पावसाऐवजी ४५४.२ मिलीमीटर पाऊस झाला.

    गोव्यामध्ये अजूनही पावसाची तूट

    बंगालच्या उपसागरातील प्रणालींचा फायदा मध्य महाराष्ट्राला सर्वाधिक झाला असून मध्य महाराष्ट्रात ७२ टक्के अतिरिक्त पाऊस झाला. कोकण-गोवा विभागात ३३ टक्के अधिक पाऊस नोंदला गेला. गोव्यामध्ये अजूनही पावसाची तूट असल्याने या तुटीचा परिणाम कोकण-गोवा विभागाच्या आकडेवारीवर झाला आहे अन्यथा कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग वगळता इतर जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये मुंबई शहर आणि उपनगरांसह, पालघर जिल्ह्याचाही समावेश होतो. पालघरमध्ये सरासरीपेक्षा ६१ टक्के अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. विदर्भात २१ टक्के, तर मराठवाड्यात १७ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील चारही विभागांमध्ये जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे दिसत आहे.
    Maharashtra TimesMumbai News : मुंबईकरांनो जरा जपून! तुमच्यावर आता CCTVची करडी नजर, एक चूक करताच कारवाई होणार; आयुक्तांचे कडक आदेश

    कुठे किती पाऊस?

    राज्यात नाशिक जिल्ह्याला जुलैच्या पावसाने फायदा झाला. नाशिक जिल्ह्यात सरासरी २९४.५ मिलीमीटर पावसाच्या तुलनेत ७९०.८ मिलीमीटर पाऊस झाला. तो १६९ टक्के अधिक आहे. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात १२९ टक्के, पालघरमध्ये १२४ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली. मुंबई उपनगरात ७४ टक्के, मुंबई शहरात ६० टक्के, रायगडमध्ये ५७ टक्के, ठाणे जिल्ह्यात ५३ टक्के, धुळे जिल्ह्यामध्ये ५३ टक्के, जळगावमध्ये ४९ टक्के आणि अहिल्यानगरमध्ये ४८ टक्के अधिक पाऊस झाला. यामुळे धरण क्षेत्रालाही फायदा झाल्याचे दिसते.
    Maharashtra TimesTukaram Mundhe : एआय वाईट नाही, पण वापरावर यश अवलंबून; तुकाराम मुंढेंचा सल्ला, सोशल मीडियावर दिसतं म्हणून प्रत्येक रील खरं नसतं

    ६ ते १३ ऑगस्टपर्यंत कमी पर्जन्यमान?

    राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला असला, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उणे २७ टक्के, नंदुरबार जिल्ह्यात उणे २३ टक्के पाऊस नोंदला गेल्याने या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाची लक्षणीय तूट कायम राहिली. यासोबतच सोलापूर १७ टक्के, बीड सहा टक्के आणि हिंगोलीमध्ये ५ टक्के तूट नोंदली गेली. सहा ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत पश्चिम विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग, तसेच उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग येथे पावसाचे सातत्य राहू शकते. त्यामुळे पावसाची ही स्थिती आणखी सुधारेल, अशी शक्यता आहे. सहा ते १३ ऑगस्ट या काळात मात्र कोकण, विदर्भ येथे सरासरीहून कमी पाऊसमानाची शक्यता आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा