• Sun. Aug 16th, 2026

मुंबई-अहमदाबाद महामार्ग होणार चकाचक, काँक्रिटीकरणाला प्रारंभ, गडकरींच्या भेट देताच….

मुंबई-अहमदाबाद महामार्ग होणार चकाचक, काँक्रिटीकरणाला प्रारंभ, गडकरींच्या भेट देताच….

म. टा. वृत्तसेवा, वसई: खड्डे आणि सततची वाहतूककोंडी यांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्ग सध्या चांगलाच चर्चेत आहे. या महामार्गावरील खड्डे बुजवण्यात आले असले, तरी रस्त्याच्या विविध समस्या कायम आहेत. त्यामुळे वाहनचालक हैराण झाले असून अपघातदेखील घडत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी संपूर्ण महामार्गाचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला, तरी या कामाला विलंब होत होता. अखेर, मागील महिन्यात वसईत आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महिन्याभरात काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर, ५ डिसेंबरपासून महामार्गाच्या काँक्रिटीकरणास सुरुवात झाली आहे.

वसई-विरार महापालिका हद्द तसेच वसईच्या ग्रामीण भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग गेला आहे. गुजरात आणि मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी हा महत्त्वाचा महामार्ग आहे. मात्र महामार्गालगत झालेली अनधिकृत बांधकामे, माती भराव यांमुळे यंदाच्या पावसाळ्यात महामार्गावर अनेक दिवस, मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. पाणी तुंबण्याच्या जोडीलाच, महामार्गावर मोठमोठे खड्डेदेखील पडले होते. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागत होती. यामुळे अपघातही होत होते. खड्डे आणि पाणी तुंबण्याची ही समस्या दरवर्षी पावसाळ्यात उद्भवत असल्याने, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली होती. पालघरचे खासदार राजेंद्र गावित, वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, भाजपचे मनोज पाटील आणि वसईतील भूमिपुत्र फाउंडेशननेही या महामार्गाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची आणि काँक्रीटीकरण करण्याची मागणी केली होती. मात्र या कामासाठी मुहूर्त मिळत नव्हता.

शाळेच्या आवारातच गुरुजींचे कारनामे, तीन शिक्षिकांसह अश्लील कृत्य, बीडमधील घटनेने खळबळ

मागील महिन्यात वसईत एका कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालत, महामार्गाचे काम महिन्याभरात सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ५ डिसेंबरपासून महामार्गावर खानिवडे टोलनाक्यापासून मुंबईच्या दिशेने काम सुरू झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेला शब्द वेळेत पूर्ण केला आणि एक महिन्यात काम सुरू झाले, याबद्दल वसईकरांनी त्यांचे आभार मानले आहेत. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.

असे असेल मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे काम-

– महामार्गाच्या महाराष्ट्राच्या हद्दीतील संपूर्ण १२१ किमीचे काँक्रीटीकरण करणार

– पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले, कल्वर्ट नव्याने बांधणार

– महामार्गावर तीन अंडरपास

– पथदिवे, तसेच १० पादचारी पुलांची उभारणी करणार

– यासाठी ६०० कोटींचा खर्च अपेक्षित

टक्केवारी, भ्रष्टाचार बाजूला ठेवून चांगले रस्ते द्या, खड्ड्यात पणत्या लावल्या; ठाकरे गट आक्रमक

‘वंदे मातरम्’ वेळी सोनिया गांधींनी खर्गेंसाठी खुर्ची मागितली, भाजपचा संताप, ‘गांधी घराण्याला संपूर्ण गायनाबाबत एवढी अस्वस्थता का?’
हे मुंढे कोण आहेत? रिझर्व्हेशन लिस्टमध्ये नाव पाहताच रेस्टॉरंट चालक चपापले, मित्राचा फोन, तुकाराम मुंढेंच्या मुलाचा भन्नाट किस्सा
Central Railway : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकण अन् उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना फटका; महत्त्वाच्या तीन गाड्या बंद, अडचणींचं कारण पुढे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed