Central Railway News : मध्य रेल्वेने तीन गाड्या पुन्हा सुरु करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. दादर-बलिया एक्स्प्रेस १७ ऑगस्टपासून नियमित धावणार आहे. दादर-गोरखपूर एक्स्प्रेस १८ ऑगस्टपासून नियमित धावणार आहे. तर अन्य तीन महत्त्वाच्या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत.
आणखी दोन गाड्या उपलब्ध
गाडी क्रमांक ०१०२७/०१०२८ दादर-गोरखपूर विशेष गाडीचे ११०४७/११०४८ दादर-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये, ०१०२५/०१०२६ दादर–बलिया विशेष गाडीचे ११०४३/११०४४ दादर-बलिया एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दादर-बलिया एक्स्प्रेस १७ ऑगस्टपासून, तर दादर-गोरखपूर एक्स्प्रेस १८ ऑगस्टपासून नियमित धावणार आहे. यामुळे उत्तर भारतातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी आता आणखी दोन गाड्या उपलब्ध झाल्या आहेत.
Baramati Police : कंबरेला पिस्तूल घेऊन सर्रासपणे फिरला, बारामती पोलिसांना खबर, सापळा रचत मुसक्या आवळल्या
कार्यवाही करण्याचे निर्देश
राज्यातील रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी कोकण विकास समितीकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मार्च २०२३मध्ये तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रेल्वेगाड्यांच्या मागणीबाबत तपासणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. आमदार रवींद्र चव्हाण, खासदार रवींद्र वायकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवले होते. वैष्णव यांनी व्यवहार्यता तपासणीचे आदेश देऊन चार महिने उलटूनही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवीन गाड्यांसाठी मार्गक्षमता उपलब्ध
लोकलचा वक्तशीरपणा, मार्गक्षमता आणि परिचालनातील अडचणींचे कारण देत प्रवासी मागणी असलेल्या प्रमुख गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याच मार्गावर आता विशेष गाड्या सुरू करून त्या नियमित करण्यात येत असल्याने नवीन गाड्यांसाठी मार्गक्षमता उपलब्ध आहे, मग जुन्या महाराष्ट्रातील गाड्यांसाठी ती का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘अन्य राज्यांमध्ये जाणाऱ्या गाड्या नियमित करण्यास महाराष्ट्रातील प्रवाशांचा विरोध नाही. मात्र, महाराष्ट्रातील पूर्वापार सुरू असलेल्या आणि प्रवाशांच्या रोजच्या गरजा भागवणाऱ्या गाड्या बंद ठेवून त्याच मार्गांवर नव्या आंतरराज्यीय गाड्या नियमित केल्या जात असतील, तर त्यातून असमानतेची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. मध्य रेल्वे महाराष्ट्रातील प्रवाशांबाबत भेदभाव करत नाही, हे कृतीतून सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ आहे. जुन्या महाराष्ट्रातील गाड्यांचेही पुनर्संचालन करून प्रशासनाने सर्व प्रदेशांना समान न्याय दिल्याचा संदेश द्यावा,’ अशी मागणी जयवंत दरेकर यांनी केली आहे.
Pankaja Munde : माझे वडील कमळातच जन्मले आणि कमळातच विसावले, पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर पंकजा मुंडे यांची रोखठोक प्रतिक्रिया
गोवा महामार्गावर २० ठिकाणी धोका
गणेशोत्सवासाठी गावी मोठ्या संख्येने कोकणवासी दाखल होणार असतानाच, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील २० अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) निश्चित करण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यात पळस्पे ते पोलादपूर या सुमारे १५० किलोमीटरच्या मार्गावर १७ अपघातप्रवण ठिकाणे असून, रत्नागिरी जिल्ह्यात खेड-भोस्ते आणि हातखंबा, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली-जाणवली परिसराचाही यात समावेश आहे.
गेली सुमारे १८ वर्षे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाही या मार्गावरील धोकादायक ठिकाणांची समस्या कायम आहे. गणेशोत्सवाच्या काळात या महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने निश्चित करण्यात आलेल्या अपघातप्रवण ठिकाणांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना आणि आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी वाहनचालक आणि प्रवाशांकडून होत आहे.
Tukaram Mundhe : खरंच मित्रासोबत जेवायला ज्या हॉटेलवर गेले तिथे धाड टाकली होती का? तुकाराम मुंढेंनी सांगितलं व्हायरल कहाणीतलं सत्य
सुरक्षा यंत्रणेचे विशेष लक्ष
कोकणातील माणगाव-पुणे जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातील ठिकाणाचा नव्याने अपघातप्रवण क्षेत्रात समावेश झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावरील खेड-भोस्ते आणि हातखंबा गाव या दोन ठिकाणांचाही यामध्ये समावेश आहे. याशिवाय रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६वरील रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख-दाभोळे हे ठिकाणही अपघातप्रवण क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आले आहे. या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात झाल्याने ती अपघातांच्या दृष्टीने धोकादायक मानली जात आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी या ठिकाणांवर सुरक्षा यंत्रणेचे विशेष लक्ष राहणार आहे, अशी माहिती राज्य पोलिस आणि महामार्ग पोलिसांच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
