• Sat. Sep 21st, 2024
मध्यरात्रीपर्यंत मुलं जागतात, झोपेच्या गणितानुसार शाळांच्या वेळा बदलाव्या, राज्यपालांची सूचना

मुंबई : ‘बदलत्या जीवनशैलीनुसार सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मध्यरात्रीपर्यंत मुले जागीच असतात. परंतु, शाळांसाठी त्यांना लवकर उठावे लागते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. मुलांची झोप चांगली व्हावी या दृष्टीने शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा,’ अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात केली.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा प्रारंभ बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांवरील ताण दूर करण्याच्या दृष्टीने राज्यपाल बैस यांनी शिक्षण विभागाला सूचना केल्या. ‘मुलांच्या दप्तराचा भार हलका करण्यासाठी पुस्तकविहीन शाळा, ई-वर्ग यांना चालना द्यावी. शाळांचे गुणवत्तेनुसार श्रेणीकरण करून त्यांना बक्षिसे द्यावीत. यातून शाळांमध्ये सुधारणेसाठी स्पर्धा होईल,’ असे बैस यांनी नमूद केले.

दोन टक्के मतांमुळे सत्तापालट, महाराष्ट्रात निघालेल्या KCR यांचं तेलंगणातच पानिपत कसं झालं?
‘शिक्षण विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व्हावे यासाठी शिक्षकांनी त्यांना गृहपाठ कमी द्यावा; तसेच खेळ व इतर कृतिशील उपक्रमांवर भर द्यावा,’ अशी सूचनाही त्यांनी केली. ‘सायबर गुन्ह्यांपासून मुलांचे रक्षण व्हावे यासाठी शाळांमध्ये व्याख्याने व सत्रांचे आयोजन केले जावे,’ असे ते म्हणाले. ‘राज्यात शेकडो सार्वजनिक ग्रंथालये आहेत. मात्र ही ग्रंथालये आज ओस पडली आहेत. बहुतांश पुस्तके जुनी किंवा कालबाह्य झाली आहेत. सर्व वाचनालयांना इंटरनेट, कम्प्युटर सुविधा देऊन नवसंजीवनी देणे आवश्यक आहे. यासाठी ग्रंथालय दत्तक योजना सुरू केली पाहिजे,’ असे त्यांनी नमूद केले.

Pune News : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, पुण्याच्या ससून रुग्णालयातील डॉक्टरला अटक
या कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’, ‘गोष्टींचा शनिवार’, ‘आनंददायी वाचन’, ‘दत्तक शाळा उपक्रम’, ‘माझी शाळा, माझी परसबाग’, ‘स्वच्छता मॉनिटर-२’ व मुंबई महानगरपालिकेच्या नवीन शालेय इमारतींचे लोकार्पण आदी योजनांचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त सुरज मांढरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या ‘मित्रा’ला मलबार हिलचा बंगला, सरकारकडून १५ लाखांची कार, विरोधकांचा हल्लाबोल

‘गावात आदर्श शाळा असावी…’

‘आदर्श शाळा निर्माण करण्यावर सर्वांनीच भर द्यायला हवा. गावांमध्ये एकवेळ मंदिर, मशिद अथवा चर्च नसले तरीही चालेल, मात्र गावात आदर्श शाळा असावी,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. उद्योगपती मुकेश अंबानी हे शाळांच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी गुंतवणूक करण्यास तयार असल्याची माहितीही शिंदे यांनी या वेळी दिली.

बिरसा मुंडा यांची जयंती, नंदुरबारमध्ये CM शिंदे आणि राज्यपालांचं मानाची खास टोपी अन् आदिवासी नृत्याने स्वागत!

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed