• Sat. Sep 21st, 2024

‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाला यश, पण अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून नको ते घडलं, शेट्टींकडून दिलगिरी

‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाला यश, पण अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून नको ते घडलं, शेट्टींकडून दिलगिरी

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे गेल्या दोन महिन्यांपासून ऊस दरासाठी आंदोलन करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हे रोखून धरत आंदोलन केलं. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या मागणीला यश देखील मिळाले आहे. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांच्यावर फुलांची आणि गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. मात्र यातील काही अतीउत्साही आणि मद्यपान केलेल्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घालत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या वेळी काही कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांना खांद्यावर उचलून घेतले असताना धक्काबुक्की केल्याने राजू शेट्टी यांचा रस्त्यावर तोलदेखील गेला.यावेळी माध्यम प्रतिनिधींनीसोबतही धक्काबुक्कीचा प्रकार घडला. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शिस्त आता बिघडत चालली आहे का हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. चळवळ ही टिकली पाहिजे असे म्हणत राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या ताकदीवर अनेक आंदोलन यशस्वी करून दाखवली. आता देखील गेल्या दोन महिन्यांपासून ऊस दर आंदोलन त्यांनी हाती घेतलं. याचाच एक भाग म्हणून आज राजू शेट्टी यांनी पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग तब्बल आठ तास रोखून धरला.

रायगड लोकसभा : ठाकरेंचं ठरलं, अनंत गीतेंची उमेदवारी जाहीर, तटकरेंसह मावळच्या बारणेंना इशारा
या आंदोलनात मोठ्या प्रमाणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयात संध्याकाळच्या सुमारास साखर कारखानदार आणि राजू शेट्टी यांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा पार पडली आणि अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी साखर कारखानदारांनी मान्य केली. यामुळे गेल्या आठ तासांपासून सुरू असलेलं आंदोलनाला यश प्राप्त झालं आणि कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी राजू शेट्टी यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात केला तर त्यांना गुलाल लावत खांद्यावर ही उचलून घेण्यात आले.

यावेळी काही अतिउत्साही आणि मद्यपान केलेल्या कार्यकर्त्यांनी बेफान होऊन एकमेकांना धक्काबुक्की करत गोंधळ घातला. तर या गोंधळात राजू शेट्टी यांचा तोल देखील गेला. दुसऱ्या बाजूला माध्यम प्रतिनिधींना देखील मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की करण्यात आली. हा प्रकार राजू शेट्टी यांना लक्षात येताच त्यांनी त्वरित मध्यस्थी करत सर्व कार्यकर्त्यांना स्वतः बाजूला केले. तसेच उत्साही कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. यावेळी माध्यम प्रतिनिधींना झालेल्या धक्काबुक्की बद्दल त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते माध्यमांना कधीच धक्काबुक्की करणार नाहीत.

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना मागासवर्गीय आयोगाचं मोठं पाऊल, घरोघरी सर्व्हेक्षण
काही जणांकडून या आंदोलनाला जाणून-बुजून हिंसक रूप देण्याचा प्रयत्न होत आहे. काही इतर लोकांनी आंदोलनात घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असा आरोप राजू शेट्टी यांनी यावेळी केला. मात्र राजू शेट्टी यांच्या गेल्या काही आंदोलन आणि मोर्चाचा आढावा घेतला तर प्रत्येक आंदोलन आणि मोर्चामध्ये काही हुल्लडबाज कार्यकर्त्यांमुळे संपूर्ण आंदोलन आणि मोर्चाला गालबोट लागल्याचे चित्र दिसून येते. यामुळे शांततेत आणि शिस्तप्रिय पद्धतीने आंदोलन करणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शिस्त आता बिघडत चालली आहे काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हायवेवर राजू शेट्टींनी नऊ तास मुक्काम ठोकला, दिवस संपताच शेतकऱ्यांनी फुलं अन् गुलाल उधळत जल्लोष केला

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed