• Sat. Sep 21st, 2024

प्रदूषणात चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकावर, दिवाळीच्या फटाक्यांमुळे परिस्थिती बिकट, नागरिकांची चिंता वाढली

प्रदूषणात चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकावर, दिवाळीच्या फटाक्यांमुळे परिस्थिती बिकट, नागरिकांची चिंता वाढली

चंद्रपूर: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी; रविवारी फटाक्यांमुळे देशभरातील ८५ शहरांमध्ये मागील २४ तासांत सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्थितीत गेला होता. यामध्ये राज्यातील दहा शहरांचा समावेश असून पुणे टॉप तर चंद्रपूर दुसऱ्या स्थानी नोंदविला गेला आहे. या वाढलेल्या प्रदूषणाच्या मात्रेने नागरिकांची चिंता वाढली आहे. फटाक्यांवर बंदी आणण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

दिवाळी हा आनंदाचा सण. अंधारलेल्या आयुष्यात सकारात्मकता पेरणारे प्रकाशपर्व. या उजळणीला नेहमी फटाक्यांची सोबत मिळते. पण, याच फटाक्यांमुळे देशाच्या अनेक भागात जीवघेणे प्रदूषण वाढले आहे. पावसाळी वातावरणामुळे हवेची गुणवत्ता सुधारली होती. बहुतांश वेळेला ‘वाईट’ या गटात असलेली काही शहरांची हवा ‘उत्तम’ गटात मोडत होती. जगातील सर्वात सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक असलेल्या दिल्लीतही दोन दिवसांपूर्वी काही प्रमाणात शुद्ध आणि समाधानकारक हवा मिळत होती.

४०० वर्षांपूर्वी जहाज बुडाले, अमाप सोने-चांदी, रत्नांचा साठा, मेटल डिटेक्टर घेऊन पाणबुडे समुद्रात
रविवारी मागील २४ तासांत दिल्लीत सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक ३५८ वर जात अतिवाईट स्थितीत गेला आहे. राज्याचा विचार करता पुण्यामध्ये सर्वाधिक वाईट स्थिती दिसली. पुण्याखालोखाल चंद्रपुरातील प्रदूषणाचा क्रमांक नोंदविला आहे. या हवेत दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास बहुतांश लोकांना श्वास घेण्यास त्रास होत होता.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दर ताशी ऑनलाइन दाखविलेल्या धूलीकण प्रमाण आकडेवारीवरून चंद्रपुरात रात्री १० वाजताच्या नोंदीनुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीचा धूलीकण निर्देशांक ४५५ असल्याची माहिती ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. मागील २४ तासांतील सरासरी ही कमी असली तरी तासाला जास्त असल्याची पुष्टी त्यांनी जोडली. रात्री ८ ते १२ वाजतापर्यंत प्रदूषण पातळी सर्वाधिक होती.

मागील २४ तासांतील हवा गुणवत्ता निर्देशांक

पुणे : २६२

चंद्रपूर : २४०

लातूर : २३१

बदलापूर : २२९

अकोला : २२७

नाशिक : २२२

नवी मुंबई : २१६

जळगाव : २१२

नागपूर : २०७

सोलापूर : २०४

५३ शहरे अतिवाईट स्थितीत

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नोंदीनुसार राजधानी दिल्लीसह देशातील ५३ शहरे फटाक्यांमुळे प्रदूषणात अतिवाईट स्थितीत गेली होती.

पप्पा, आता मला छळ असह्य होत आहे, वडिलांना इतकं बोलून उच्चशिक्षित लेकीचं सासरी टोकाचं पाऊल
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed