• Sat. Sep 21st, 2024

क्रिकेट की भाऊबीज? Ind Vs NZ सेमीमुळे चाहत्यांचा संभ्रम, भावाच्या औक्षणासाठी मुहूर्त कोणता?

क्रिकेट की भाऊबीज? Ind Vs NZ सेमीमुळे चाहत्यांचा संभ्रम, भावाच्या औक्षणासाठी मुहूर्त कोणता?

मुंबई : क्रिकेटसाठी वेळात वेळ काढणाऱ्या भारतीयांना मोठा सणही रोखू शकत नाही. सणांच्या दिवशी कुटुंबासह क्रिकेट सामना पाहणे हा तर दुग्धशर्करा योग म्हणूनच ओळखला जातो. बुधवारच्या भाऊबीजेलाही वर्ल्ड कपमधील भारत विरुद्ध न्यूझीलंडचा उपांत्य सामना मुंबईत रंगणार आहे. या सामन्याच्या तिकिटांची विक्री कधीचीच संपली असून, आता काळाबाजाराने वेग घेतला आहे. २५ हजार रुपयांपासून ते १ लाख रुपये मोजून सामन्याच्या तिकिटांवर उड्या पडत आहेत.

क्रिकेटचा उत्साह ठीक आहे मात्र अशाप्रकारे काळ्याबाजारात तिकीट खरेदी करताना फसवणूक होण्याचा धोका असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

भाऊबीजेच्या दिवशीच भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याची पर्वणी असून हा सामना वानखेडे स्टेडियमवर आहे. ऑनलाइन तसेच इतर माध्यमातून सामन्याची तिकिटे याआधीच विकली गेली आहेत. सामन्याच्या मुहूर्तानुसार भाऊबीजेचा सण साजरा करण्याचा कार्यक्रम रसिकांनी निश्चित केला आहे. भाऊबीज असूनही अनेकजण अजूनही हा सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये जाण्यास उत्सुक असून, मिळेल त्या दराने तिकीट खरेदी करण्याची त्यांची तयारी आहे.

उपांत्य फेरीचे नियम काय आहेत? सामना झाला नाही तर फायनलचे तिकीट कोणाला मिळणार, जाणून घ्या
रसिकांच्या क्रिकेटवेडाचा फायदा घेत काळ्या बाजारात २५ हजार रु. ते १ लाख रुपयांपर्यंत तिकिटाची बोली लागली आहे. मात्र, पोलिसांनी रसिकांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. ही तिकिटे बनावट किंवा याआधी वापरण्यात आलेली असू शकतात; त्यामुळे ती खरेदी करणे टाळा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

भारत-न्यूझीलंडमधील निर्णायक लढतीत पहिल्या २० ओव्हर महत्त्वाच्या, सुरुवातच ठरवणार सामन्याचा विजेता

काळाबाजार करणारा अटकेत

मूळ किंमतीपेक्षा जास्त दराने काहीजण भारत न्यूझीलंड सामन्याची तिकिटे विकत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. या आधारे पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जे. जे. मार्ग पोलिसांच्या पथकाने मालाड येथून आकाश कोठारी या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून काही तिकिटे हस्तगत करण्यात आली असून, याबाबत तपास सुरू आहे. आकाशचे साथीदारही यामध्ये गुंतले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

भारत-न्यूझीलंड सामन्यात टॉस जिंकल्यास संघ प्रथम गोलंदाजी की फलंदाजी निवडणार? जाणून घ्या कसं आहे पिच

‘भाऊबीजेचा मुहूर्त दिवसभर’

‘भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या सेमीफायनलच्या दिवशी भाऊबीजेचा मुहूर्त असल्याने मुंबईकरांमध्ये क्रिकेट की भाऊबीज असा संभ्रम निर्माण झाला आहे. पण भाऊबीजेचा संपूर्ण दिवस महत्त्वाचा असल्याने कोणत्याही वेळी दिवसभरात भाऊबीज साजरी केली तरी चालेल’ अशी माहिती खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. ‘बहीण-भावाचे नाते रक्ताचे असून, ते मुहूर्तावर अवलंबून नसते. भाऊबीजेचा पूर्ण दिवस शुभ असून दिवसभरात कधीही बहिणीने ओवाळावे’, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed