• Sat. Sep 19th, 2026

आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय, बॅनर समाजकंटकांनी फाडले अन् तरुणांना मारहाण

आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय, बॅनर समाजकंटकांनी फाडले अन् तरुणांना मारहाण

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्रबिंदू आता जालना जिल्हा बनला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण करुन मराठा आरक्षणाचा विषय सरकारच्या प्राधान्यक्रमावर आणला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यांनी उपोषण मागं घेताना गावबंदी देखील मागे घ्या असं सांगितलं होतं. पण, काही गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी कायम होती. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर येथील सकल मराठा समाज बांधवांनी आणि गावकऱ्यांनी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्व पुढार्‍यांना तसेच आमदार,खासदारांना गावात प्रवेश बंदीचे बॅनर गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावले होते. मात्र, हे बॅनर समाजकंटकांनी फाडले आणि बॅनर लावणाऱ्यांना मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

राज्य सरकारशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबर पर्यंतचा वेळ दिला आहे. मनोज जारांगे यांचे उपोषण सध्या स्थगित झाले आहे.पण असे असले तरी काही गावांमध्ये खासदार,आमदार,राजकीय पक्षाचे नेते यांना गाव बंदी घातलेली आहे आणि तसे बॅनर गावाच्या वेशीवर लावण्यात आलेले आहेत.

शरद पवारांच्या दाखल्यावर ओबीसी नोंद? सोशल मीडियावर फोटो VIRAL, सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं
राजकीय नेत्यांना गाव बंदीचे बॅनर बोरगाव जहांगीर या गावात लावण्यात आले आहेत.सध्या आरक्षणाच्या विषयावर सरकारी स्तरावर हालचाली सुरू असताना काही समाज कंटकानी गावात लावलेले हे बॅनर रात्रीच्या वेळी फाडून टाकले.यावेळी या समाजकंटकांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठा समाज बांधवांना समाज कंटकानी लाठ्या काठ्यांनी मारहाण करत जखमी केले आहे.
शुभमन गिलने रचला इतिहास, जगभरात कोणत्याच खेळाडूला ही गोष्ट जमली नाही…
याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे काही गावांमध्ये तणावाचे वातावरण पसरले होते. दरम्यान हा बॅनर फाडण्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.सध्या सगळे सुरळीत झालेले असताना बॅनर फाडण्याच्या या प्रकाराने पुन्हा वातावरण ढवळून निघाले होते.परंतु पोलीस प्रशासनाने योग्य ती पावले उचलल्याचे तूर्तास वाद निवळला आहे.

शतकवीर श्रेयसच्या बॅटींगचे सिक्रेट द्रविड यांनी सांगितले, म्हणाले …त्यामुळे त्याची खात्री असते
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed