• Sun. Sep 22nd, 2024

…तर महाबळेश्वरची अवस्था लोणावळ्यासारखी होईल, उदयनराजे भोसले यांनी का व्यक्त केली भीती?

…तर महाबळेश्वरची अवस्था लोणावळ्यासारखी होईल, उदयनराजे भोसले यांनी  का व्यक्त केली भीती?

सातारा : महाबळेश्वरात नदीपात्रात चुकीच्या पद्धतीने बांधकामे झाली आहेत. भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. स्थानिक नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास या पर्यटनस्थळाची अवस्था लोणावळ्यासारखी होईल,’ अशी भीती खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. महाबळेश्वर, पाचगणी येथील अनधिकृत बांधकामांबाबत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार
पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार मकरंद पाटील यांच्यासह महाबळेश्वर, पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी, प्रांताधिकारी तसेच हॉटेल व्यायसायिक उपस्थित होते.

उदयनराजे भोसले म्हणाले, महाबळेश्वरला जागतिक पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. येथील निसर्गाचे आपणच संवर्धन करायला पाहिजे. हे सौंदर्य जर आपण टिकवले नाही, तर कोण टिकवणार आहे. आज परिस्थिती अशी आहे की, अनेकांना नोकऱ्या नाहीत. स्ट्रॉबेरीची शेती निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाचा हा समतोल ढासळू न देण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असंही त्यांनी सांगितली.

महाबळेश्वरच्या वेण्णा नदीपात्रात चुकीच्या पद्धतीने बांधकामे झाली आहेत. तालुक्यात बाहेरून आलेल्या लोकांनी जरी बांधकामे केली असली, तरी गेल्या काही वर्षांत स्थानिकांची कुटुंबेदेखील वाढून विस्तारली गेली आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर उत्तराखंडसारखे भीषण संकट आपल्यावर ओढावेल, असंही ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरण, भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला सोलापूर पोलिसांकडून तडीपारीची नोटीस
चेरापुंजीनंतर सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला होत असतो. त्यामुळं जर काही घटना घडली तर त्याला कोण जबाबदार असेल, असाही प्रश्न उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी आणि त्यांच्या अधिकारी वर्गानं चांगल्या प्रकारे भूमिका मांडली आहे. जर आपण महाबळेश्वरचं सौंदर्य आपण जपलं नाही तर कोण जपणार नाही, असंही ते म्हणाले.
सामना सुरु होण्यापूर्वीच पाकिस्तान वर्ल्ड कपमधून आऊट, इंग्लंडने केला मोठा गेम, पाहा काय घडलं..
एक काळ असा होता की लोणावळ्याला सर्वत्र हिरवीगार वृक्षराजी पाहायला मिळत होती. आता येथील वृक्षांची अवस्था वाईट झाली आहे. तेथील झाडांची संख्या देखील कमी झाली आहे. त्यामुळे महाबळेश्वर व इथल्या निसर्गाची जर आपण जपणूक केली नाही, तर भविष्यात महाबळेश्वरचा लोणावळा व्हायला वेळ लागणार नाही, असंही उदयनराजे भोसले म्हणाले.
वर्ल्डकपमधून पाकिस्तानचा गाशा गुंडाळला; सेमीफायनलचे ४ संघ ठरले, नॉकआउट लढतीचे संपूर्ण वेळापत्रक
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed