• Thu. Mar 12th, 2026

    मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अजितदादांचा निर्णय, माळेगाव कारखान्याचा कार्यक्रम रद्द

    मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अजितदादांचा निर्णय, माळेगाव कारखान्याचा कार्यक्रम रद्द

    बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ होणार होता. मात्र मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या कार्यक्रमाला कोणत्याही राजकीय व्यक्तीने उपस्थित राहण्यावर मराठा समाजाने आक्षेप घेतला होता. त्यानुसार आज कारखाना परिसरात आंदोलक एकवटले आहेत या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आजचा हा नियोजित दौरा रद्द झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

    कारखाना परिसरातील शेतकरी पुतळ्याजवळ आंदोलक एकवटले असून आरक्षणाच्या समर्थनात घोषणाबाजी सुरू आहे. ‘जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है… एक मराठा लाख मराठा.. ‘आरक्षणाच्या आमच्या हक्काचे. ‘नाही कुणाच्या बापाच.. एक मिशन मराठा आरक्षण..’ या मजकुराचे फलक घेऊन मराठा आंदोलक आंदोलन स्थळी जोरदार घोषणाबाजी करत आहे. कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

    पोटात पाण्याचा थेंबही नाही, डोळ्यांवर ग्लानी, बोलताना धाप; उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगेंची प्रकृती कशी?

    या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमाला येणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र कार्यक्रमास्थळी मराठा समाजाकडून आंदोलन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे कारखान्यातील सदर कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

    राजकीय नेत्यांना घातलेली गावबंदी खटकली, मराठा समाजाला चंद्रशेखर बावनकुळेंचा खास सल्ला

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकताच बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम पार पडला. यानिमित्त आयोजित सभेत मराठा समाजाच्या युवकांनी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं.. नाही कुणाच्या बापाचं. अशा घोषणाबाजी करून रोष व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप परत घोषणाबाजी करणाऱ्या युवकांना सभास्थळापासून बाहेर नेले. त्यानंतर आज शनिवारी २८ रोजी माळेगाव कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे निश्चित होते. मात्र या कार्यक्रमावरही आंदोलनाचे गडद सावट असल्याने अजित पवारांना कार्यक्रम रद्द करावे लागल्याचे दिसून येत आहे.

    आरक्षण कधी देणार तेवढंच सांगा; मराठा आंदोलकांनी शंभूराज देसाईंना पुरतं घेरलं, प्रश्नांची सरबत्ती

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed