• Sat. Sep 21st, 2024
अर्धांगिनीच्या निधनानंतर बाबामहाराजांचाही जगाचा निरोप, वारकरी संप्रदायाला पोरकेपणाची भावना

नवी मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांचं निधन झालं. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नवी मुंबईतील नेरुळ येथे त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच त्यांच्या अर्धांगिनी रुक्मिणी सातारकर यांचं निधन झालं होतं.

‘माई’ अर्थात रुक्मिणी सातारकर यांचं दोन फेब्रुवारी २०२३ रोजी निधन झालं. बाबामहाराज सातारकर यांच्या अध्यात्माच्या विचार प्रसाराच्या कार्यात त्यांनी सक्रीय योगदान दिलं होतं. आठ-नऊ महिन्यांच्या अंतराने दोघांनीही जगाचा निरोप घेतल्याने वारकरी संप्रदायात पोरकेपणाची भावना व्यक्त होत आहे.

बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी २७ ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचं पार्थिव आज दुपारी तीननंतर अंत्यदर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येईल.

दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या नातवाचे अपघाती निधन, गाडीचे चाक डोक्यावरुन गेल्याने गतप्राण
बाबामहाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं.

गरबा खेळताना भोवळ येऊन पडला, ऐन नवरात्रात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
बाबामहाराज सातारकर यांनी १९८३ पासून संतांच्या गावी दरवर्षी कीर्तन सप्ताह आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. यात त्यांनी भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर इत्यादी ठिकाणी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले. त्यांनी जनसेवा करण्यासाठी चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेचीही स्थापना केली. या माध्यमातून भाविकांना वैद्यकीय सुविधाही पुरवण्यात येते. बाबा महाराज सातारकर यांच्या धार्मिक कार्यात त्यांच्या पत्नी रुक्मिणी उर्फ माईसाहेब यांचीही मोलाची साथ होती.

आईची भेट ठरली शेवटची, कांदिवलीच्या आगीत माजी IPL क्रिकेटपटूने गमावले दोन जीवलग
बाबामहाराज यांच्या घरात गेल्या १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदयाची परंपरा आहे. बाबामहाराज सातारकर यांचं इंग्रजी माध्यमात एसएससीपर्यंत शिक्षण झालंय. तर ८ व्या वर्षांपासून ते कीर्तनात अभंगाच्या चाली म्हणायचे. बाबा महाराज यांच्याकडे गेल्या ८० वर्षांपासून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात मानकरी परंपरा आहे. तर तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर मानकरी परंपरा १०० वर्षांपासून राखली आहे.

बीडच्या श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर संत किसन महाराज यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथी उत्सवाची सांगता!

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed