• Sun. Sep 22nd, 2024

बोगस फळपीक विमा लाटणाऱ्यांना दणका, तब्बल साडे तेरा कोटी जप्त, अनुदान लाटणाऱ्यांना चाप

बोगस फळपीक विमा लाटणाऱ्यांना दणका, तब्बल साडे तेरा कोटी जप्त, अनुदान लाटणाऱ्यांना चाप

म. टा. प्रतिनिधी, पुणे: फळपिकांची लागवड केली नसतानाही विमा लाटला, दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतीवर भाडेकरार दाखवून त्यांच्या नकळत विमा काढला, फळपीकाच्या लागवडीपेक्षा अधिक क्षेत्रासाठी विमा लाटला, फळपीकाचे उत्पादन नसताना त्या क्षेत्रासाठी विमा घेतला.. असे प्रकार राज्यात आढळून आले आहेत. अशा अपात्र व बनावट विम्याचे १४ हजार ५७० प्रस्ताव नामंजूर करण्यात आले असून, अर्जदारांनी विम्याच्या हप्त्यापोटी भरलेले साडेतेरा कोटी रुपये कृषी विभागाने जप्त केले आहेत. त्यामुळे बनावट विमा अनुदान लाटणाऱ्यांना चाप बसला आहे.

कृषी विभागाच्या या कारवाईमुळे दोन वर्षांत केंद्र व राज्य सरकारचे आंबिया बहार हंगामात ५१ कोटी ८७ लाख रुपये आणि मृग बहारात ४४ कोटी ५७ लाख रुपये अशा एकूण ९६ कोटी रुपयांच्या विमा हप्त्याच्या अनुदानाची बचत झाली आहे. अपात्र विमा अर्जाच्या हप्त्यापोटी जप्त केलेली रक्कम केंद्र सरकारच्या तांत्रिक विकास निधीमध्ये जमा केली जाणार आहे. त्यामुळे फळपीक विमा योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांना मोठा दणका बसला असून, या योजनेत प्रामाणिकपणे सहभागी झालेल्या शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत फळपिकांच्या दोन प्रमुख हंगामात संत्रे, मोसंबी, लिंबू, चिकू, पेरू, सीताफळ, द्राक्ष, आंबा, काजू, पपई, स्ट्रॉबेरी, डाळिंब, केळी या प्रमुख पिकांसाठी विविध नैसर्गिक संकटांपासून विमा संरक्षण दिले जाते. या योजनेत सहभागी शेतकऱ्यांच्या फळबागांच्या लागवडीची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी संयुक्त धडक मोहीम राबविली. त्यामध्ये बनावट विमा लाटण्यासाठी अर्ज केल्याचे धक्कादायक प्रकार उघड झाले.
धक्कादायक… लातूरमध्ये फुग्यात गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट, विक्रेत्याचा जागीच मृत्यू, १२ मुलं जखमी

असा झाला परिणाम

फळपीक विमा योजनेत चुकीच्या पद्धतीने सहभागी होणाऱ्यांनी कृषी विभागाच्या या कारवाईचा धसका घेतला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या मृग बहार हंगामाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात दाखल विमा अर्जांची संख्या ४० हजारांनी कमी झाली आहे. विमा संरक्षित क्षेत्रही २८ हजार ५८७ हेक्टरने घटून विमा कंपन्यांच्या हप्त्यापोटी केंद्र व राज्य सरकारचे ४४ कोटी ५७ लाख रुपये वाचले आहेत, अशी माहिती कृषी आयुक्तालयाने दिली.

राष्ट्रवादी कुणाची याचा निकाल कुणाकडून येणार, शरद पवार मुंबईतील सभेत उत्तर सांगत म्हणाले…

मृग बहारातील दोन वर्षातील अर्जांची संख्या.

(क्षेत्र-हेक्टरमध्ये, विमा हप्ता कोटी रुपयांत)

हंगाम दाखल विमा अर्ज संख्या विमा संरक्षित क्षेत्र एकूण विमा हप्ता
मृग बहार २०२२ १,१४,४१५ ८१,६६० १२७.४२
मृग बहार २०२३ ७४,२७५ ५३,०७३ ८२.८५
…..
झालेली घट ४०,१४० २८,५८७ ४४.५७

सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, भीम आर्मीचा कार्यकर्ता ताब्यात, पोलिसांनी बंदोबस्त लावला पण…

पावसाळ्यात जंगलात येणाऱ्या रानभाजीची शेती, शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed