• Sat. Sep 21st, 2024
Thane News: ठाण्यातील येऊरमधील टर्फ क्लबवर कारवाई, पालिका प्रशासनाने सील ठोकले

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : निसर्गरम्य येऊरमध्ये सुरू असलेल्या बेकायदा टर्फ क्लबला ठाणे पालिका प्रशासनाने अखेर सील ठोकले आहे. टेनिस, क्रिकेट, फुटबॉल अशा खेळांसाठी रात्री उशिरापर्यंत भाड्याने दिल्या जाणाऱ्या टर्फ क्लबवरील कारवाईने टर्फ चालकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे येऊरचे निसर्गवैभव टिकून राहण्यास मदत होणार आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत येणाऱ्या येऊरमध्ये अनधिकृतरित्या उभारलेल्या सात बंगल्यांवरील पालिकेच्या कारवाईच्या मोहिमेला दोन आठवड्यांपूर्वी न्यायालयाने स्थगिती आदेश दिले होते. त्यानंतर थंडावलेल्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईने पुन्हा वेग घेतला आहे. येऊरमध्ये आधीच बेकायदा बांधकामे, हॉटेल्स, ढाबे, लग्न व इतर समारंभासाठी लॉन उभारले असताना गेल्या काही वर्षांत कोणत्याही परवानगीशिवाय अनधिकृत टर्फ क्लब बांधण्यात आले. याठिकाणी प्रखर विद्युत प्रकाशझोतात क्रिकेट, टेनिस, फुटबॉलसारखे मैदानी खेळ खेळले जात होते. याप्रश्नी अनेकवेळा स्थानिकांनी, सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणीय संस्थांच्या मदतीने आवाज उठवला होता. तसेच विधिमंडळातसुद्धा यावर चर्चा झाली. अखेर पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. ठाणे पालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीत येणाऱ्या तब्बल पाच टर्फवर ही कारवाई केल्याची माहिती वर्तकनगर प्रभाग समितीचे सहायक आयुक्त अभिजित खोले यांनी दिली.

मुंबईच्या वेशीवरील टोलबाबत मोठी बातमी: निर्णय सरकारच्याच हाती; मंत्रिमंडळाची भूमिका काय?
तोंडदेखली कारवाई: पर्यावरणप्रेमींचा आरोप

मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या जनहित याचिका क्रमांक १०२/२०२३ रोहित जोशी विरुद्ध ठाणे महानगरपालिका यामधील पुढील सुनावणी ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या अगोदर झालेल्या सुनावणीदरम्यान ठाणे महानगरपालिका तसेच पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र सनियंत्रण समिती वन विभाग तसेच वीज मंडळाला प्रतिज्ञापत्रावर येऊरमधील टर्फ कलबसकट इतर अनधिकृत बांधकामांबाबत ३० दिवसात सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. प्रतिज्ञापत्र सादर करण्याची मुदत टळून १५ दिवस झाले तरी यापैकी एकानेही ते सादर केलेले नाही. उच्च न्यायालयासमोर आपले पितळ उघडे पडू नये यासाठी केवळ एक दिवस अगोदर पालिका प्रशासनाने तोंडदेखली कारवाई केल्याचा आरोप याचिकाकर्ते व पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी केला आहे.

वनडे विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ही गोष्ट, श्रीलंका-पाकिस्तान संघांच्या नावे अनोखा विक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed