• Tue. Jun 9th, 2026
    चक्क मंत्र्यांच्या बैठकीत बत्ती गुल, मोबाइल टॉर्चच्या उजेडात बैठक,अधिकाऱ्यांना झापलं

    गडचिरोली: जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मंत्री धर्मरावबाबा आत्राम आढावा बैठका घेत आहेत.२० सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील कुरखेडा येथे त्यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी वीज विभागाचा मुद्दा समोर आला अन् नेमकी याचवेळी ‘बत्ती गुल’ झाली. सतत अर्धा तास विद्युत पुरवठा खंडित असल्याने मंत्रिमहोदय कमालीचे संतापले.

    मोबाइल टॉर्चच्या उजेडात बैठक

    मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कुरखेडा येथे आढावा बैठक सुरू असतानाच बत्ती गुल झाली. कुरखेडा तालुक्यातील वीजपुरवठा संदर्भात गंभीर चर्चा सुरू असताना वीज बेपत्ता झाली. वारंवार वीज गेल्यानं संतापलेल्या मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. दीर्घकाळ प्रतिक्षा करूनही वीज येत नसल्याने शेवटी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात बैठक आटोपती घेण्याची वेळ आत्राम यांच्यावर आली. वीज पुरवठ्याच्या अभावी विजेसंदर्भातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर तिथून मंत्री निघून गेले. दरम्यान चक्क मंत्र्यांनाच अंधारात आढावा बैठक पार पाडावी लागल्यानं या घटनेसंदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत. विजेच्या लपंडावाचा मंत्र्यांना असा फटका बसत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय स्थिती असेल, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे.

    अजित पवार हे शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले अन् अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागली.मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्या कामाचा वेग प्रचंड वाढला आहे.ते जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आढावा बैठका घेत आहेत.
    भारत-ऑस्ट्रेलियाचे वनडे सामने लाइव्ह कुठे पाहू शकता, स्टार-सोनी नाही तर हे चॅनेल लावा….
    कुरखेड्यात १३२ केव्ही वीजपुरवठ्यासंदर्भात मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सुनावले. विदर्भातील प्रमुख चेहरा म्हणून आमदार धर्मरावबाबांना अजित पवार यांनी थेट बढती दिली. सत्तेत सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच विस्तारात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले.
    राज्य सरकारवर मोठी नामुष्की,परराज्यात ऊस निर्यात बंदी निर्णय ४ दिवसात मागे; राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांचा उद्रेक…
    त्यांच्याकडे अन्न औषध प्रशासन विभाग आहे.विदर्भात पक्ष मजबूत करण्याकरिता ते रोजच्या रोज दौरे करीत आहेत. विशेष करून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. २० सप्टेंबर रोजी त्यांनी जिल्ह्यातील कुरखेडा उपविभागात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या वेळी नागरिकांच्या विविध समस्या समोर आल्याने या बैठकीचे रूपांतर जनता दरबारात झाले.

    Pune Rain : पुण्यातील काठापूरमध्ये आभाळ फाटलं, तीन तास ढगफुटीसदृश्य पाऊस, उभी पिके भुईसपाट,शेतकरी म्हणतात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed