• Tue. Sep 15th, 2026

Marathwada Rain Update : दोन दिवस धो-धो बरसला, पण पुन्हा विश्रांती, मराठवाड्यात शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा; हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज

Marathwada Rain News : मराठवाडा विभागात अद्यापही जोरदार पावसाची अपेक्षा आहे. दोन दिवस हजेरी लावल्यानंतर पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकरी देखील चिंतेत आहेत.

मराठवाडा पाऊस बातम्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : दोन दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर मराठवाड्यात पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे. विभागात पुढील पाच दिवस तुरळक पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. कमी पाणीसाठा आणि रब्बी हंगामासाठी परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे. तूर्तास, पावसाने पुन्हा दडी मारली आहे.

जोरदार पावसाची शक्यता नाही

मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे दिलासा मिळाला होता. राज्यातील इतर भागातही पावसाला सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पाऊस सुरू आहे. मराठवाडा विभागात दोन दिवस हजेरी लावल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. विभागातील एकाही जिल्ह्यात पुढील पाच दिवस म्हणजे १८ सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता नाही. तुरळक पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात रविवारी पाऊस झाला. शहर परिसरात १०.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव तालुक्यात पाऊस झाला नाही. वैजापूर, गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे.

Maharashtra TimesPune Metro: पुणेकरांकडून गणेशोत्सवात तुफान गर्दी; मेट्रोकडून आता विशेष वेळापत्रक, रात्री किती वाजेपर्यंत धावणार गाड्या?

जिल्हानिहाय पाऊस कसा?

दरम्यान, विभागात गेल्या २४ तासांत ५.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक १५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर ५.७, जालना ८.४, बीड ०.४, लातूर ४.४, धाराशिव १.२, परभणी ०.७ आणि हिंगोली १.७ मिमी असा जिल्हानिहाय पाऊस झाला आहे.

दुष्काळ जाहीर करा

मराठवाड्यात पावसाने महिन्याहून अधिक काळ ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून पिके पूर्णपणे करपून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ सप्टेंबर रोजी ‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा’ जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर कडाडून टीका केली.

Maharashtra TimesManoj Jarange Patil : ‘मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य, पण काही गोष्टी शक्य नाही’; CM फडणवीसांचं मोठं विधान, मनोज जरागेंचं मुंबईकडे प्रस्थान

केवळ पोकळ घोषणा

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त केवळ पोकळ घोषणा केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात सिंचन, आरोग्य व शिक्षणाचा अनुशेष कायम असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे मोठे नुकसान झाले असून दुष्काळी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. आरक्षण प्रश्नावरून सरकार मराठा व धनगर समाजाकडे केवळ मतपेटी म्हणूनच पाहत असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

विविध मागण्यांचे निवेदन

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आमदार मीरा रेंगे, महापौर सय्यद इकबाल, डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, विष्णू मुरकुटे, अंबिका डहाळे, माजूलाला, अरविंद देशमुख, शिवलिंग बोधणे, प्रभू जयस्वाल आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणीतील समांतर पाणीपुरवठा, शासकीय रुग्णालय, सिंचन प्रकल्प, रेल्वे दुहेरीकरण व जिंतूर बायपास यांसारख्या रखडलेल्या कामांचा जाब विचारत, हक्काचा विकास निधी मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा आमदार दानवे, डॉ.पाटील आणि आंदोलकांनी दिला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा