• Sat. Sep 21st, 2024
संध्याकाळी सात ते नऊ, ३५ हजार विद्यार्थ्यांच्या घरी अनोखी ‘बंदी’, जाणून घ्या डिसले पॅटर्न

नाशिक : करोनामुळे शालेय विद्यार्थी मोबाइल आणि ‘टीव्ही’च्या आहारी गेल्याचे दुष्परिणाम समोर येऊन ते गृहपाठही विसरल्याचे आढळले. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी नाशिक महापालिकेच्या शंभर शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३५ हजार विद्यार्थ्यांच्या घरी सायंकाळी सात ते नऊदरम्यान ‘टीव्ही’ आणि मोबाइल बंद करण्याचा ‘डिसले पॅटर्न’ अवलंबिला जात आहे. आता हा नाशिकचा ‘पॅटर्न’ राज्यभरात राबविला जाणार आहे.

महापालिकेच्या वतीने वारकरी, कीर्तनकार संस्थांना आवाहन करून ग्रामीण भागात महापालिकेच्या या उपक्रमाचा प्रचार, प्रसार केला जाणार आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारीपदाची जबाबदारी घेतल्यापासून बी. टी. पाटील यांनी वेगवेगळे उपक्रम राबवून शिक्षण विभागात सुधारणा सुरू केल्या आहे. महापालिका शाळांमध्ये अभिनव प्रयोग केले आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांमधील कलात्मक गुणांना चालना देण्यासाठी महापालिकेच्या शंभर शाळांमध्ये आता ‘दप्तरमुक्त शनिवार’ ही संकल्पना राबविली जात आहे. शनिवारी शाळेत केवळ सांस्कृतिक उपक्रम, विविध विषयांवर व्याख्याने, तसेच विविध खेळ खेळले जात आहेत. ‘टीव्ही’, मोबाइल हे शिक्षण आणि मनोरंजनाचे साधन असले, तरी त्यांच्या अतिवापराचे विपरित परिणाम आजच्या पिढीवर होत आहेत. करोनामुळे मुलांच्या हातात मोबाइल पडल्यापासून मुले मोबाइल, तसेच करमणुकीचे साधन म्हणून ‘टीव्ही’च्या आहारी गेली आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३५ हजार मुलांच्या घरी ‘डिसले पॅटर्न’ राबविला जात आहे. दररोज सायंकाळी सात ते नऊ वाजेदरम्यान टीव्ही, तसेच मोबाइल बंद ठेवून मुलांना अभ्यास करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. आता हाच ‘पॅटर्न’ राज्यभर राबविण्याचा संकल्प शिक्षण विभागाने सोडला आहे.

नाशिक जिल्ह्यात धरणांची ओंजळ रितीच; २४पैकी दोनच धरणे भरली, कोणत्या धरणात किती पाणी?

तोल जाऊन इमारतीवरून कोसळले, दोन कामगारांचा मृत्यू

अशोकस्तंभ व सिडको परिसरातील दोन कामगारांचा तोल गेल्याने मृत्यू झाला. मृतांमध्ये पंकज रमेश वाघमारे (वय ३५, रा. महात्मा फुले शासकीय वसाहत, टिळकवाडी, शरणपूर रोड) व राज नारायण राय (३६, रा. जगतापवाडी, सातपूर) या कामगारांचा समावेश आहे. आश्रमाच्या तिसऱ्या मजल्यावरून वाघमारे यांचा, तर राय यांचा पाचव्या मजल्यावरून तोल गेल्याने सोमवारी मृत्यू झाला.

व्यावसायिक हेमंत पारख यांचं अपहरण नेमके कशासाठी, पोलिसांची पथकं परराज्यात, गूढ कधी उलगडणार?
सुरक्षित साधनांचा विसर

सिडको : सिडकोतील सूर्योदय कॉलनी, सावतानगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून तोल गेल्याने राज नारायण राय (वय ३६, रा. जगतापवाडी, सातपूर) या कामगाराचा सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मृत्यू झाला. आरसीसी काम संपल्यानंतर राय पाचव्या मजल्यावर बांधकाम साहित्याचे मटेरियल लिफ्टच्या साह्याने पोहोचवत असताना ही घटना घडली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना राबवल्या नसल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे.

“तू माझ्या भावाच्या लई बदनाम्या करतो”….रील्स अपलोड केलं मग पोलिसांनी वठणीवर आणलं, इतरांचे धाबे दणाणले

महापालिका शिक्षकांना ड्रेसकोडची सक्ती

शहरातील खासगी शाळांच्या धर्तीवर महापालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविला जात असून, या प्रकल्पाचे काम ७० टक्क्यांपर्यंत झाले आहे. शाळा स्मार्ट होत असताना आता शाळांमधील शिक्षकांना स्मार्ट करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाने सुरू केला असून, आठशे शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. सोबतच आता महापालिका शाळांमध्ये वर्ग सुरू असताना मोबाइलबंदी करण्यात आली असून, पाठोपाठ आता शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या धर्तीवर ड्रेसकोडची सक्ती केली जाणार आहे. पांढरा शर्ट आणि काळी पँट असा पेहराव शिक्षकांना असेल.

पतीचे अनैतिक संबंध, नाशिक पोलिस ठाण्याबाहेर दोन महिला भिडल्या

महापालिकेच्या शाळांमधून खासगी शाळांमध्ये विद्यार्थी स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आधुनिक युगाशी स्पर्धा करण्यासाठीचे शिक्षण महापालिका शाळांमध्ये देणे गरजेचे असल्याने शहरातील खासगी शाळांच्या धर्तीवर महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण स्मार्ट शिक्षण मिळावे, यासाठी स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविला जात आहे. शंभरपैकी ६९ शाळांमध्ये हा प्रकल्प राबविला जात असून, या प्रकल्पाचे काम ७० टक्के झाले आहे. क्षमताधिष्ठित आणि अत्याधुनिक अध्यापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान प्रणाली, डिजिटल आणि मल्टिमीडिया सामग्री, सर्वांगीण विद्यार्थी विकास, भौतिक सुविधा या सर्व घटकांचा विचार स्मार्ट स्कूलमध्ये करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना स्मार्ट करायचे असेल तर शिक्षकांनाही स्मार्ट करणे आवश्यक असल्याने महापालिका शाळांमधील ८०० शिक्षकांना स्मार्ट तंत्र हाताळणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.या प्रशिक्षणासोबत शाळेतील शिक्षकही स्मार्ट दिसावा, यासाठी विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांनाही ड्रेसकोड सक्तीचा केला जाणार आहे. शिक्षकांना पांढरा शर्ट, काळी पँट आणि महिला शिक्षिकांना पांढरी साडी असा निश्चित करण्याचा विचार शिक्षण विभागाने सुरू केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील प्रस्ताव आयुक्तांकडे ठेवला जाणार आहे. त्यामुळे पालिका शिक्षकांना आता ड्रेसकोडची सक्ती केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed