• Sat. Sep 21st, 2024
काळजी करू नका, माझी तुम्हाला खंबीर साथ, राज ठाकरे यांचा मनोज जरांगे यांना फोन

जालना : जालन्यात झालेल्या लाठीहल्ल्यानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते आणि प्रतिनिधी मराठा समाजातील आंदोलकांची भेट घेतायत. काल शरद पवार, उद्धव ठाकरे, संभाजीराजे, उदयनराजेंनी मराठा आंदोलकांना धीर दिल्यानंतर आज मनसेच्या वतीने बाळा नांदगावकर आंतरवलीला पोहोचले. यावेळी नांदगावकरांच्या करवी राज ठाकरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधला. काळजी करू नका, माझी तुम्हाला खंबीर साथ आहे, मराठा आरक्षण लढ्यात मनसे तुमच्यासोबत उभा आहे, असा विश्वास राज ठाकरे यांनी जरांगे यांना दिला. त्यावर आमची चूक नसताना आम्ही लाठ्या-काठ्या खाल्ल्या, उलट आमच्यावरच पोलिसांनी गुन्हे दाखल केले, आता तुम्हीच आम्हाला पुढचं मार्गदर्शन करा, असं जरांगे राज यांना म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी आंदोलनकर्ते जरांगेंशी फोनवरुन संवाद साधला. शुक्रवारी घडलेल्या घटनेची त्यांनी जरांगे यांच्याकडून माहिती घेतसी. यावेळी एक एक करून जरागेंनी राज यांना घटनेची माहिती दिली. यावेळी घटनेची माहिती घेतल्यानंतर राज यांनी जखमींचीही विचारपूस केली. मनसेचे नेते बाळ नांदगावकर हे त्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यांनी सुद्धा या आंदोलकांची विचारपूस केली. तसेच, मनसेचा उपषोणकर्त्यांना पाठिंबा असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

लाठीमार करण्यासाठी पोलिसांना मंत्रालयातून फोन गेला होता-तो फोन कुणाचा? संजय राऊत यांचा सवाल
आंदोलनकर्त्यांना न्याय मिळवून देऊ, मनसे तुमच्या पाठीशी

आम्हालाच मारुन आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत. लहान लहान मुलांना मारण्यात आलंय. माय माऊल्यांनाही काठीने मारलं. कुणावर गोळ्या चालवल्या गेल्या. आम्ही शांततेत आमरण उपोषण करत होतो. यावर आम्हाला काय बोलावं हेच कळत नाही. पण हा असा अन्याय आम्ही निजामाच्या काळात देखील पाहिला नव्हता आणि इंग्रजांच्या काळात देखील पाहिला नव्हता, अशी व्यथा जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यासमोर मांडली. यावेळी आंदोलनकर्त्यांना न्याय मिळवून देऊ, मनसे तुमच्या पाठीशी आहे, असं आश्वासन राज ठाकरे यांनी दिलं.

म्हणून आंदोलन चिरडून लाठीचार्ज करण्यात आला, उद्धव ठाकरे यांना ‘त्रिशुळ’ सरकारवर संशय
पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल टाकलं नसणार

ही घटना अतिशय दुर्दैवी आहे असल्याचं सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घटनेचा निषेध नोंदवला. जालन्यात काल असं काय घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल टाकलं नसणार. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित, असं मत व्यक्त करताना राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली.

मुंबई-गोवा हायवेची वाट ही जमिनी विकत घेण्यासाठी; राज ठाकरेंनी कोकणी माणसाला कारण सांगितलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed