• Mon. Mar 16th, 2026

    रश्मी शुक्लांना ती गोष्ट टाळता येणार नाही, प्रकाश आंबेडकरांनी थेट सांगितलं…

    रश्मी शुक्लांना ती गोष्ट टाळता येणार नाही, प्रकाश आंबेडकरांनी थेट सांगितलं…

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीची माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली गेलीच नाही. या दंगलीची माहितीच त्यांना मिळाली नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. फडणवीस यांना दंगलीची माहिती मिळाली असती तर त्यांनी पुण्यात येऊन दंगलीची माहिती घेतली असती, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

    कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीसंदर्भात आयोगाचे अध्यक्ष जे. एन. पटेल आणि सदस्य सुमित मलीक यांच्या दोन सदस्यीय आयोगापुढे बुधवारी अॅड. आंबेडकर यांची पुण्यात सकाळी साडेअकरा ते दुपारी पावणेतीन वाजेदरम्यान साक्ष नोंदविण्यात आली. आयोगाच्या साक्षीनंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी आंबेडकर यांची मिलिंद एकबोटे यांच्यातर्फे अॅड. एस. के. जैन तसेच माळवदकर, जमादार कुटुंबियातर्फे रोहन माळवदकर यांनी उलटतपासणी केली. तर आंबेडकर यांच्यावतीने अॅड. किरण कदम यांनी काम पाहिले. आता येत्या १६ सप्टेंबरला त्यांची पुन्हा साक्ष होणार आहे.

    अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक जानेवारीला कोरेगाव भीमा पासून ४० किलोमीटर अंतरावर नगर जिल्ह्यात होते. ११.३० ते ११.४० या दरम्यान त्यांचे हेलिकॉप्टर ‘टेक ऑफ’ झाले आहे. ही दंगल सकाळी झाल्याने त्यांना कळले असते तर पुण्यात येऊन त्यांनी दंगलीची माहिती घेतली असती. मात्र, त्यांना दंगलीची माहितीच मिळाली नाही, अशी माझी स्वतःची माहिती आहे. त्यामुळे हे प्रशासकीय की राजकीय अपयश आहे याचा तपास आयोगाने करावा अशी मागणी आयोगाकडे केली आहे.’

    माझ्या साक्षीदरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे आयोगासमोर आली आहेत. ती वाचण्यात आली आहेत. पण त्याच्यात तेथील ग्रामपंचायतींने दंगलीसंदर्भातील ठराव दिले होते. ही दंगल घडविण्यात आलेली आहे. व्हाट्स अॅपवर आलेली चॅट्स, एकमेकांमबद्दल बदललेली माहिती ही सर्व कागदपत्रे आयोगासमोर सादर करण्यात आली आहे, असे अॅड. आंबेडकर यांनी सांगितले.
    मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचं आयुर्मान वाढणार, BMC चा एक निर्णय गेमचेंजर ठरणार
    आयोगाकडे सादर केलेल्या कागदांवरून कोल्हापूर परिक्षेक्षाच्या गुप्तचर विभागाकडे या दंगलीबाबत नेमकी काय माहिती होती याची माहिती विचारावी. तसेच पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हे कोठे होते आणि त्यांची भूमिका काय होती हे तपासण्यात यावे. माझ्या माहिती प्रमाणे पोलिसांची काही युनिट्सकडून माहिती संकलित केले होते. त्यांच्याकडून ही माहिती वरिष्ठ पातळीवर जाऊ दिली नाही. गृह सचिव, मुख्यमंत्री यांच्यापर्यंत किती वाजता हे संदेश गेले हे तपासणे महत्वाचे आहे, अशी आयोगाला विनंती केल्याचे अॅड. आंबेडकर यांनी साक्षीदरम्यान सांगितले.
    नेपाळच्या मोठ्या चुकीमुळे झाला बाबर आझमचा वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा सामन्यात नेमकं घडलं तरी काय…

    समन्स टाळता येणार नाही

    कोरेगाव भीमा आयोगासमोर पुण्याचे माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांचीही साक्ष नोंदविण्यात येणार असल्याबाबत विचारता, ‘रशमी शुक्ला यांना आयोग कधीही समन्स काढू शकते. त्यांना समन्स टाळता येणार नाही. त्या आयोगासमोर का येत नाहीत ते प्रतिज्ञापत्र आल्याशिवाय कळणार नाही,’ असे आंबेडकर यांनी शुक्ला यांच्याबाबत सांगितले.

    Sharad Pawar Retirement: शरद पवारांचे वय झाले, त्यांनी निवृत्ती घ्यावी; पुण्यात वर्ग मित्राचा सल्ला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *