• Sun. Mar 15th, 2026

    पुण्याला जाण्यासाठी विमान सज्ज, टेकऑफपूर्वीच वैमानिकाने गमावला जीव, विमानतळावरच सारं संपलं

    पुण्याला जाण्यासाठी विमान सज्ज, टेकऑफपूर्वीच वैमानिकाने गमावला जीव, विमानतळावरच सारं संपलं

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : टेकऑफपूर्वीच इंडिगो एअरलाइन्सच्या वैमानिकावर जीव गमावण्याची दुर्दैवी वेळ आली. ही घटना गुरुवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. कॅप्टन मनोज सुब्रमण्ययम (वय ४०) असे या वैमानिकाचे नाव आहे. पुण्याच्या दिशेने उड्डाण भरण्याच्या तयारी असताना त्यांना विमानतळावरच हृदयविकाराचा धक्का आला आणि मृत्यू झाला.

    इंडिगो एअरलाइन्सचे नागपूर-पुणे विमान दुपारी १ वाजतादरम्यान उड्डाण घेणार होते. त्यासाठी कॅप्टन मनोज सुब्रमण्ययम हे निघाले असताना बोर्डिंग गेटजवळ अचानक कोसळले. विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने त्यांना उचलण्यात आले. विमानतळावर तैनात असलेल्या किम्स-किंग्ज्वे हॉस्पिटलच्या वैद्यकीय चमूने प्राथमिक तपासणी केली. त्यानुसार, त्यांना हॉस्पिटलला आणण्यात आले. मात्र, मनोज ब्रॉड डेड असल्याचे कळताच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे हलविण्यात आले, अशी माहिती किम्स-किंग्ज्वे हॉस्पिटलचे उपमहाव्यवस्थापक (ब्रॅण्डिंग अॅण्ड कम्युनिकेशन्स) एजाज शमी यांनी दिली.

    प्राप्त माहितीनुसार, उद्या, शुक्रवारी शवविच्छेदन होणार आहे. तुर्तास, मनोज यांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण कार्डियाक अरेस्ट असल्याचे सांगण्यात येत असले तरी शवविच्छेदनानंतर नेमके कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
    लिव्ह-इन पार्टनरने मुलाला चापट मारली; त्यानंतर संतापाच्या भरात धारदार सुरी…

    व्यक्त केली शोकसंवेदना

    वैमानिक मनोज सुब्रमण्ययम यांच्या मृत्यूनंतर इंडिगो एअरलाइन्सने निवेदन जाहीर करत शोकसंवेदना व्यक्त केली. ‘आज नागपूरमध्ये आमच्या एका वैमानिकाचे निधन झाल्याचे दुःख आहे. नागपूर विमानतळावर त्यांची तब्येत अचानक बिघडली. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे त्यांचे दुर्दैवी निधन झाले,’ असे म्हणत कंपनीने त्यांचे कुटुंबीय आणि आप्तस्वकीयांना हा धक्का सहन करण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना केली आहे.
    टीम इंडिया सावधान, सचिन व धोनीला बाद करणारा मॅचविनर आहे आयर्लंडच्या संघात, नाव आहे…
    पर्याप्त विश्रांतीनंतर कामावर
    वैमानिकांचे काम हे अतिशय कौशल्य आणि जिकरीचे असते. त्यांच्यावर कामामुळे येणारा ताण दूर करण्यासाठी विमान कंपन्यांकडून विश्रांतासाठी दोन उड्डाणांदरम्यान पुरेसा वेळ देण्यात येतो. त्यानुसार, मनोज हे २७ तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा कामावर रूजू झाले होते. विश्रांतीपूर्वी, त्यांनी त्रिवेंद्रम-पुणे-नागपूर असे दोन सेक्टर चालवल्याची माहिती आहे.

    उद्धव ठाकरेंचं लोकसभेसाठी प्लॅनिंग, नाशिक मतदारसंघाच्या बैठकीत मविआसंदर्भात मोठं वक्तव्य, म्हणाले…

    आश्चर्यच! कासवाला फक्त सावजी चिकन आवडतं; ते दिले तरच मारतो ताव, नाही तर नाक मुरडतो

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed