• Tue. Mar 10th, 2026
    मी उजळ माथ्यानं फिरणारा, कधी लपून गेलो ते सांगा, अजित पवारांची पत्रकारांना गुगली

    कोल्हापूर: पुण्याच्या बैठकीचे कोणीही काहीही मनावर घेऊ नका. पवार साहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. मी त्यांचा पुतण्या लागतो. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका. मी काय कुठेही लपून गेलो नाही. मी कधी लपून गेलो सांगा ना? असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
    दीड महिना झाले अजित पवार आले नाहीत; मतदारसंघात एकच चर्चा, …तेव्हाच दादा बारामतीत येणार!
    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात पुण्यात भेट झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर बाहेर पडताना अजित पवार माध्यमांशी नजर चुकवत ते आपल्याच गाडीतून झोपून गेल्याचे काही व्हिडीओ समोर आले. त्यानंतर एकच चर्चा राजकीय वर्तूळात रंगू लागली होती. यावर अजित पवारांनी भाष्य केले असून मी शरद पवार यांचा पुतण्या लागतो. ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका. मी काय कुठेही लपून गेलो नाही. मी उजळ माथ्याने फिरणारा आहे.

    ते पुढे म्हणाले, चोरडिया यांचे आणि आमचे दोन पिढ्यांचे नाते आहेत. चोरडिया यांनी पवार साहेबांना जेवायला बोलावले होते. दोन पिढ्या ओळखीच्या व्यक्तीच्या घरी जाणे काय चुकीचे असे म्हणत. चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडलेल्या आणि धडकलेल्या गाडीत मी नव्हतोच. तसेच या पुढे ही आम्ही भेटलो तर ती कौटुंबिक भेट असेल. मी दिवाळीला भेटेन, दसऱ्याला भेटेन ती भेट कौटुंबिक असेल, असेही अजित पवार म्हणाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज स्वातंत्र्याच्या ७६व्या वर्धापनदिनानिमित्ताने ध्वजारोहण पार पाडले. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा समाजातील प्रमुख लोकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

    राष्ट्रवादीत कोणताच संभ्रम नाही; अजितदादा अन् शरद पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं उत्तर

    मात्र याचवेळी बैठकीत अचानक गोंधळ झाला. योगेश केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी बैठकीत अचानक गोंधळ घातल्यामुळे परिस्थिती नियंत्रणापलिकडे गेली होती. विशेष म्हणजे ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करत गोंधळ झाला असून त्यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले असून मराठा समाजाच्या बाबतीत आम्ही घेतलेला निर्णय हायकोर्टात टिकला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्टात टिकला नाही. पण मराठा समाजाला मदत होईल याबाबत अनेक निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच मुंबईमध्ये मराठा समाजातील नेत्यांची बैठक घेऊ, असे ही अजित पवार म्हणाले आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed