आज मंगळवारी दुपारी पाऊस वाजण्याच्या दरम्यान आम्ही तिरुपती येथे जात असताना कोल्हापूर एअरपोर्टला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट झाली.त्यावेळी उर्वरित गाळ काढण्याकरता निधी मिळावा यासाठी चिपळूणचे आमदार शेखर निकम प्रयत्न करत आहे, त्यांना आणि आम्हा चिपळूणवासियांना सर्वतोपरी मदत करा, अशी विनंती या महिलांनी अजित दादांना एअरपोर्टवरच केली. त्यावेळी त्यांनी पाऊस संपल्यावर लगेच निधी आणि आवश्यक यंत्र सामुग्री देतो, असे आश्वासन दिले आहे.
क्षणाचाही विलंब न लावता कोकणातील सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूणसाठी हे आश्वासन महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासकीय कामकाजात नेहमीच चर्चेत राहिलेले अजित पवार यांनी आम्हाला मोठा शब्द देऊन धीर दिला. अजितदादांच्या या कार्यपद्धतीवर चिपळूण येथील मित्र-मैत्रिणी ग्रुपही खुश झाला व अजित दादांचे त्यांनी धन्यवाद मानले व हा ग्रुप पुढे श्री तिरुपतीच्या दर्शनासाठी एअरपोर्टवरून रवाना झाला. यावेळी चिपळूण येथील मित्र मैत्रिणी ग्रुप तर्फे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व आमदार शेखर निकम यांचे आभार मानण्यात आले.
परखड व स्पष्ट मत व्यक्त करणारे उपमुख्यमंत्री अजितदादा हे कार्यपद्धती व स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या व्यस्त वेळात काही मिनिटांची झालेली ही एअरपोर्टची भेट यावेळी अजित दादांनी आम्हाला दिलेला शब्द हा आमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे नक्कीच चिपळूण कायमचे पुर मुक्त होईल, असा विश्वास चिपळूण येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या माजी नगरसेविका अदिती देशपांडे यांनी व्यक्त केला. चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी चिपळूण बचाव समितीकडून यापूर्वी मोठे आंदोलन करण्यात आलं होत, त्यामुळे शासनाकडून गेल्या वर्षी मोठं काम हाती घेण्यात आले होते. मात्र हे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दिलेला हा शब्द चिपळूणकरांसाठी सुखावणारा ठरला आहे.
चिपळूण येथील मित्र-मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये यावेळी माजी नगरसेविका अदिती देशपांडे यांच्या समवेत डॉ.विकास जोगळेकर,मंजुषा जोगळेकर,प्रकाश कदम अजय देशपांडे,माया कदम,सनी भाटिया व आरोही भाटिया उपस्थित होते.