• Sat. Sep 21st, 2024

ज्वेलरी मालकासह पुतण्याचे अपहरण; पोलिसांची चक्रे फिरली आणि काही तासांतच लावला छडा

ज्वेलरी मालकासह पुतण्याचे अपहरण; पोलिसांची चक्रे फिरली आणि काही तासांतच लावला छडा

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका ज्वेलरी मालकासह पुतण्याचे अपहरण केल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी याचा छडा लावला आणि दोघांचाही शोध घेण्यात पोलीस यशस्वी झाले. मध्यरात्री पोलिसांना दोघांचा शोध लागला. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याबाबत माहिती दिली.

कोल्हापूरातल्या जयसिंगपूर येथील स्टेशन रोडवरील शंकेश्वर ज्वेलर्सचे मालक नवलमल पोरवाल आणि त्यांचा पुतण्या यश पोरवाल यांचे अपहरण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास गतीमान करत काही तासांत दोघांचा शोध घेतला.
लेकाने आईचे पांग फेडले, तिच्या सर्व इच्छा केल्या पूर्ण अन् निधनानंतरही पालखीतून काढली अंत्ययात्रा
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातील सातव्या गल्लीतील शंकेश्वर ज्वेलर्सचे मालक नवलमल पोरवाल (वय ७०) व त्यांचा पुतण्या यश जैन यांचे काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात पाच ते सहा जणांनी जबरदस्तीने अपहरण केल्याची घटना घडली. संकेश्वर ज्वेलर्सचे मालक नवलमय पोरवाल आणि त्यांचा पुतण्या यश जैन हे आपले दुकान नऊच्या दरम्यान बंद करून गांधी चौकातून आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी त्यांच्या घराजवळ असणाऱ्या गल्ली नंबर दोन येथील बोळ भागात अंधाराचा फायदा घेऊन मारुती व्हॅनमध्ये आधीच दबा धरून बसलेल्या पाच ते सहा तरुणांनी त्यांची गाडी अडवली आणि त्यांना जबरदस्तीने आपल्या गाडीत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी अपहरण करणारे आणि पोरवल यांच्यात झटापट झाली. तरीही त्यांनी पोरवाल आणि त्यांच्या पुतण्याला जबरदस्तीने आपल्या गाडीत घालून सुसाट वेगाने गेले.
शाळेत पोरं भांडली, बाहेर पालक भिडले; कोल्हापुरात राडा, मारामारीत एकाचा मृत्यू
दरम्यान, ही घटना संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली. या बाबतची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्हीचे कॅमेरा तपासून शोध सुरू केला. मात्र त्यानंतर काही तासांतच अपहरण करणाऱ्या आरोपींनी संबंधितांना सोडून दिले आहे. जयसिंगपूर येथेच एक किलोमीटर अंतरावर आरोपींनी त्यांना सोडून दिले आणि पसार झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पालखी अन् अवभृत स्नानविधी सोहळा, पंचगंगा घाटावर भाविकांची गर्दी!

शिवाय घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही तात्काळ नाकाबंदी केली होती. शिवाय स्थानिक गुन्हे शाखेची पथके तैनात करण्यात आली होती. अपहरण करणारे कोण आहेत? त्यांनी नेमकं कशासाठी अपहरण केलं? याबाबत जयसिंगपूर पोलीस तपास करत आहेत. ज्या कारमधून आरोपी आले त्याचाही शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed