• Sat. Sep 21st, 2024
विद्यार्थी दशेतच निवडणुका; शाळेचा अभिनव उपक्रम, कोल्हापुरातील प्रशाला चर्चेत

कोल्हापूर: शालेय शिक्षण म्हणजे लहान मुलाला या जगात जगायचं कसं हे शिकवत असतं. देशाचा इतिहास, भूगोल यासह गणित आणि समाजशास्त्र मुलांना शिकवत प्रत्येक लहान मुलाला माणूस घडवण्याचं काम शाळा आणि येथील शिक्षक करत असतात. यामुळे या लोकशाही असलेल्या देशातील विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतच मतदानाचे आणि निवडणुकांचे महत्त्व कळावे यासाठी कोल्हापुरातील आंतरभारती संस्थेच्या वि.स. खांडेकर प्रशालेत एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे.
जयप्रभा स्टुडिओ राज्य सरकार ताब्यात घेणार, कलाकारांकडून साखर पेढे वाटत जल्लोष
शालेय निवडणूक घेतली असून अगदी निवडणूक आयोग कशा पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवते, त्याच पद्धतीने राबवत विद्यार्थ्यांना निवडणुकीचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेने सर्वच नागरिकांना मताचा समान अधिकार म्हणजे एक व्यक्ती एक मत – सर्वांना समान पत दिलेली आहे. लोकप्रतिनिधी निवडताना मतदानाचे महत्त्व काय असतं हे विद्यार्थी दशेतच कळावं यासाठी कोल्हापुरातील वि. स. खांडेकर प्रशालेच्या वतीने शालेय निवडणुका पार पाडण्यात आल्या. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार ज्या पद्धतीने ग्रामपंचायत पासून ते अगदी लोकसभेपर्यंत ज्या पद्धतीने निवडणुका घेण्यात येतात, त्याच पद्धतीने शालेय निवडणुका घेण्यात आल्या. शाळेतील विविध विभागांसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व करायचं होतं त्यांना वेगवेगळ्या इयत्तांमध्ये जाऊन आपण करणार असल्याच्या कामांबद्दल माहिती देऊन प्रचार करण्याची संधी दिली.

कोथिंबीरचा भाव घसरला, शेतकरी वैतागला; पेंढ्या रस्त्यावर फेकल्या

त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून योग्य प्रतिनिधीसाठी मतदान ही केलं. या निवडणूक प्रक्रियेमध्ये संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. निवडणूक प्रक्रियेमधील लोकप्रतिनिधी मतदार निवडणूक पार पाडणारे अधिकारी अशा सर्व गोष्टींवर बारीक लक्ष देऊन त्यावर विद्यार्थ्यांनी काम केलं. त्यामुळे लोकशाहीमार्फत घेण्यात येणाऱ्या सर्वच निवडणुकांची प्रक्रिया कशी असते याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण झाली. सध्या मतदान म्हटलं की अनेक जण पाठ फिरवत असतात. मतदानाच्या दिवशी शासनाकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते. मात्र अनेक जण मतदानाकडे पाठ फिरवून फिरायला जाणे पसंत करतात. यामुळे दिवसेंदिवस मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याने निवडणूक आयोग जनजागृतीकडे भर देत आहे. सोबतच शालेय स्तरावर अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केल्याने लहानपणातच विद्यार्थ्याला निवडणूक आणि मतदानाचे महत्त्व समजल्यास नवी पिढी मतदान करेल, अशी भावना येथील शिक्षकांची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed