मुंबई, ठाणे, रायगड, पुणे-साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागात येत्या ३, ४ तासात पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मुंबईला रेड अलर्ट
मुंबईला आज दुपारपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, पावसाचा वाढता जोर पाहता मुंबईला उद्या सकाळपर्यंत रेज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईला जारी करण्यात आलेला रेड अलर्ट हा उद्या शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुंबईत सतत पावसाच्या सरी कोसळत असल्याने सखल भागात पाणी साचलं आहे. तर, मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
कुठल्या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट
मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. या विभागांमध्ये आज मुसळधा पाऊस बसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कोणत्या जिल्ह्यांना आज ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट…
आयएमडीनुसार जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या ५ जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.