• Fri. Mar 20th, 2026

    तळ कोकणात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत; सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना

    तळ कोकणात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत; सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना

    म. टा. वृत्तसेवा, चिपळूण : तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यात अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने मार्ग बंद झाले आहेत. सिंधुदुर्ग-कोल्हापूर मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील मांडूकली गावात रस्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर गगनबावडा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. दोडामार्गजवळ कुडासे वानोशी येथे घराची भिंत पडून एक वृद्ध महिला जखमी झाली. दरम्यान रेवस रेड्डी या सागरी महामार्गावरही काही ठिकाणी दगड व दरड कोसळल्याने हा मार्गही वाहतुकीसाठी बंद आहे.
    Rain Update : राज्यावरील कमी दाबाचा पट्टा कायम, पाहा पावसाबाबत हवामान विभागाचा काय आहे अंदाज…
    सावंतवाडी तालुक्यात गेळे गावात येण्यासाठी मुख्य रस्त्यावरील हिरण्यांकेशी नदीवरील पूल मागील पाच ते सहा दिवस पाण्याखाली आहे. चौकुळ येथील एका महिलेच्या दोन शेळ्या नदीत वाहून गेल्या. तर एका शेतकऱ्याची गाय वाहून गेली. बांदा ते दानोलीला जाणारे रस्त्यावर तेरेखोल नदीतील पाणी रस्त्यावर आल्याने हे रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत. सातोळी ते बांदा रस्त्यावर पाणी आल्याने येथील वाहतूकही बंद करण्यात आली आहे.
    सावंतवाडीत पावसाचे थैमान, ५० पर्यटक अडकले, बांदा पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला
    तिलारी नदीमध्ये धरणाचे पाणी

    तिलारी मुख्य धरणाचा सांडवा प्रवाहित झाला आहे. रविवारी सकाळी ८ वाजता सांडव्याची पाणीपातळी १०६.७० मी. असून तिलारी नदीमध्ये १६५.८१४ घन मीटर प्रतिसेंकद वेगाने सांडव्यातून पाणी सोडले जात आहे. तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणारे पर्जन्यमान पाहता सांडव्यातील विसर्गात वाढ होऊन तिलारी नदीची पाणी पातळी वाढू शकते. यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांनी तसेच शेतकऱ्यांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    मुसळधार पावसामुळे शेतीच्या कामाला वेग,कोकणातील विहंगम दृश्य ड्रोनमध्ये कैद

    रायगडमध्ये शाळांना आज सुट्टी

    रायगड जिल्ह्यातील सगळ्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्टचा इशारा असल्यामुळे ही सुट्टी जाहीर करत असल्याचे पत्र रायगड जिल्हा प्रशासनाकडून रविवारी सायंकाळी उशिरा जारी करण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed