CJP Protest: भाजपनं मराठमोळ्या तरुणीचा एक व्हिडीओ शेअर केला. बाबर की विरासत असा उल्लेख भाजपच्या पोस्टवर होता. त्यावरुन मराठमोळ्या तरुणीनं भाजपला सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. पीपीटीच्या माध्यमातून तिनं अतिशय अनोख्या पद्धतीनं भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मुंबईतील कंटेट क्रीएटर आणि डान्सर उर्वशी पलांडूरकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नीट पेपर फुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना उर्वशीदेखील रस्त्यावर उतरली होती. त्यावेळी तिनं एक रील शूट केलं. उर्वशीचं रील व्हायरल झालं. हेच रील छत्तीसगड भाजपनं त्यांच्या इन्स्टा हँडलवरून शेअर केलं. भाजपनं उर्वशीचं रील थेट बाबरच्या वारशाशी जोडलं. त्यानंतर उर्वशीनं एका पॉवरपॉईंट प्रेंझेटेशनच्या (PPT) माध्यमातून भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तिच्या या उत्तराचं कॉकरोच जनता पार्टीनं कौतुक केलं आहे.
मुंबईत नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ झालेल्या विद्यार्थी आंदोलनात ऊर्वशी सहभागी झाली होती. शांततेत पार पडलेल्या या आंदोलनात ऊर्वशीनं एक रील चित्रित केलं होतं. तो व्हिडीओ शेअर करत भाजपनं ‘बाबरच्या वारशावर नाचणारे जेन झी,’ असा उल्लेख केला. राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार करणाऱ्या मुलाचा आणि ऊर्वशीचा आंदोलनात नाचतानाचा व्हिडीओ शेअर करत छत्तीसगड भाजपनं त्यांची तुलना केली. तुम्ही कोणत्या जेन झीची निवड करणार, असा प्रश्न भाजपकडून विचारण्यात आला. भाजपच्या पोस्टला ऊर्वशीनं पीपीटीच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे.
माझ्या परवानगीशिवाय माझा व्हिडीओ वापरण्यात आला असून त्यावर कॅप्शन लिहिण्यात आलं आहे. तेव्हापासून मला अनेकांचे मेसेज येत आहेत. तू ठीक आहेस ना, अशी विचारणा होत आहे, असं ऊर्वशीनं व्हिडीओच्या सुरुवातीला म्हटलं आहे. ‘मी तीच जेन झी विद्यार्थिनी आहे, जिच्या सोबत हे घडलं. मी या गोष्टीला गांभीर्यानं घेत नाही. त्यामुळे या व्हिडीओतून प्रतिक्रिया देत आहे,’ असं ऊर्वशीनं हसत हसत म्हटलं.
भाजपनं शेअर केलेल्या व्हिडीओची ऊर्वशीनं पद्धतशीरपणे खिल्ली उडवली आहे. ‘सर्वप्रथम, तुमचा कॅप्शन गेम खूपच कमजोर आहे. बाबरचा वारसा यासारख्या गोष्टींमुळे आजची तरुणाई जोडली जात नाही. त्यामुळे तरुणाईला जोडणारं कॅप्शन द्या,’ असा सल्ला ऊर्वशीनं छत्तीसगड भाजपला दिला आहे. Farmer Protest: आंदोलनात प्रचंड गर्दी, चालक नसलेली बस पुढे सरकू लागली; महिला एसीपींच्या धाडसानं मोठा अनर्थ टळला २०२६ मध्येही फोडा आणि राज्य करा, असा प्रश्न करत ऊर्वशीनं भाजपचा समाचार घेतला. ‘जेन झीच्या एकजुटीमुळेच संसदेपर्यंत नवे शब्द पोहोचले. त्यांच्याच फूट टाकण्याचा प्रयत्न कशासाठी?’, असा सवाल ऊर्वशीनं केला आहे. यासोबतच तिनं तिच्या शैक्षणिक कारकिर्दीची माहिती देताना घरातील पदकं दाखवली आहेत. ‘मला दहावी आणि बारावीला ९३ टक्के होते. मी अभ्यासासोबत डान्स आणि कंटेट क्रीएशन दोन्ही केलं. माझ्या घरात केवळ डान्ससाठी मिळालेली बक्षिसं नाहीत, तर अभ्यास, योग, कराटे यासाठी मिळालेली बक्षिसंदेखील आहेत. अभ्यास आणि अभ्यासेतर गोष्टी एकाचवेळी करता येऊ शकतात,’ असंही ऊर्वशीनं म्हटलं आहे.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा