• Sat. Sep 21st, 2024

रायगडच्या कर्जतमधील सोलनपाडा धरणाची पाणी पातळी वाढली, प्रशासन सतर्क, ३१ कुटुंबांचं स्थलांतर

रायगडच्या कर्जतमधील सोलनपाडा धरणाची पाणी पातळी वाढली, प्रशासन सतर्क, ३१ कुटुंबांचं स्थलांतर

नवी मुंबई : महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला तर काही गावांमध्ये पाणी शिरलं आहे. रायगड मधील इर्शाळवाडी इथेही दरड कोसळल्याची भयानक घटना घडली या घटनेमध्ये संपूर्ण गाव उध्वस्त झालं. इर्शाळवाडीची ही मन हेलावणारी घटना ताजी असतानाच कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरणाला गळती लागली असल्याचे समोर आले आहे. यामुळं सोलनपाडा धरणाला लागलेल्या गळतीच्या भीतीने प्रशासनाने सोलनपाडा येथील ३१ कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन केले आहे. त्यामध्ये काही कुटुंबातील व्यक्ती ह्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेले आहेत तर काही कुटुंब हे विजय भूमी युनिव्हर्सिटी इथे राहत आहेत.

पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सोलनपाडा हे धरण पूर्णपणे भरून वाहत आहे. पावसाचे प्रमाण वाढले तर धरण ओसांडून वाहू शकते या भीतीनेच प्रशासनाने गावातील ३१ कुटुंबांना स्थलांतरित केले आहे. तसेच इर्शाळवाडी येथे उद्भवलेली परस्थिती पुन्हा उद्भवू नये ह्या भीतीपोटी सोलनपाडा धरणातील पाणी ओढे नाले अशा ठिकाणी सोडण्याची तयारी प्रशासनाने केली असून हे धरणाची पाण्याची पातळी १ मीटर ते ९ मीटर कमी करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. रविवारी दुपार पर्यंत हे पाणी कमी करण्यात येणार असल्यामुळे गावातील रहिवाशांच्या जीवाला धोका नसल्याचे प्रशासनाने सांगितली आहे.
धक्कादायक! महिलांची अंतर्वस्त्र चोरायचा, ती परिधान करून महीलांसमोर करायचा अश्लील डान्स

सोलनपाडा धरणाची या अगोदरही गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे काम केले होते. सोलनपाडा धरणाला लागलेल्या गळतीमुळे प्रशासनाने पटापट निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. रविवारी २३ दुपारपर्यंत या धरणातील काही पाण्याचा भाग कमी करण्यात येणार आहे. प्रशासन योग्य त्या उपाययोजना राबवणार आहे. तसेच या संपूर्ण परिस्थितीबाबत बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीमध्ये सोलनपाडा धरणाला लागलेली गळती पाहता गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

रोहित शर्माने दिली संधी आणि मुकेश कुमारने पहिल्याच सामन्यात केला पराक्रम, पाहा भन्नाट Video

संबंधित प्रशासनाने हा अहवाल विचारात घेतला असून पुढे पाठवला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जांभरुख भागामध्ये ३१ कुटुंबे राहात असून या ठिकाणची लोकसंख्या ही १४२ आहे. सोलनपाडा धरणाला गळती लागताच प्रशासनाने घेतलेल्या संपूर्ण निर्णयाला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा उद्यापर्यंत कमी करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम प्रशासन करणार आहे. प्रशासनाने तातडीने घेतलेल्या निर्णयामुळे सोलनपाडा धरणाच्या आजूबाजूला असलेल्या नागरिकांच्या जीवाचा धोका टळला आहे.

Neelam Gorhe: बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या कार्य शैलीत फरक काय? नीलम गोऱ्हे मटा कॅफेत म्हणाल्या…

दरड कोसळून उद्धवस्त झालेलं इर्शाळवाडी गाव नेमकं कसं होतं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed