• Wed. Mar 11th, 2026
    पावसाची संततधार सुरूच; पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे, प्रशासन अलर्ट मोडवर

    कोल्हापूर: जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालत आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत असल्याने यंत्रणा देखील हाय अलर्टवर गेली आहे. पंचगंगा नदीची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे सुरू असून पंचगंगेची पाणी पातळी ३५ फूट ६ इंचवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण ६८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर दोन दिवसापूर्वीच पंचगंगा घाट येथे पाणी पात्राबाहेर पडल्याने आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरत असून संत गतीने पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे यंत्रणा ही सतर्क झाली आहे.
    दरड कोसळण्याची भीती; नागरिकांचे स्थलांतर, रायगडातील अजून एक गाव संकटात, मात्र गावकऱ्यांची वेगळीच मागणी
    तसेच NDRF ची १ तुकडी देखील कोल्हापुरात दाखल झाली असून सोबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे सव्यमसेवक ही अलर्ट झाली आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते की काय असे वाटू लागले आहे. गेले २ दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, राधानगरी यासह धरण क्षेत्रात ही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने राधानगरी धरणात ७१% भरले असून यामुळे धरणाच्या पॉवर हाऊसमधून १३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे.

    यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होत असून आतापर्यंत जिल्ह्यातील ६८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर आज संध्याकाळी ६ वाजता पंचगंगेची पाणी पातळी ३५ फूट ६ इंचावर गेली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट आहे, तर धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. मात्र आज दिवसभर शहरात पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे सध्या संत गतीने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ पाहता प्रशासन देखील अलर्ट झाले आहे. ज्या मार्गावर आणि बंधाऱ्यावर पाणी आले आहे, असे मार्ग बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे. तर नदी किनाऱ्याच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पब्लिक अड्रेस सिस्टीमद्वारे नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

    काळजी करू नका, प्रशासन तुमच्या पाठीशी; पूरग्रस्तांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिला धीर

    •जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेले बंधारे: पाण्याखालील बंधारे :-पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
    भोगावती नदी : हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे
    कासारी नदी : यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजारभोगाव, पेंडाखळे, करंजफेण
    हिरण्यकेशी नदी: माळगांव, सुळेरान, चांदेवाडी, दाभीळ, ऐनापूर, निलजी
    घटप्रभा नदी : पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी
    वेदगंगा नदी : निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरूपली, चिखली, गारगोटी, म्हसवे, शेणगांव
    कुंभी नदी :- कळे, शेनवडे, वेतवडे, मांडूकली, सांगशी, असळज
    वारणा नदी :- चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी, कोडोली, खोची
    कडवी नदी :- भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगांव, सवते सावर्डे, सरूड पाटणे
    धामणी नदी : सुळे, पनोरे
    तुळशी नदी :- बीड
    ताम्रपर्णी नदी : कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, काकरे, न्हावेली
    दुधगांगा नदी: दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *