• Wed. Jul 22nd, 2026

    पेटलेलं मणिपूर तुम्हाला शांत करता येईना, तुम्ही कसले विश्वगुरू? राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

    पेटलेलं मणिपूर तुम्हाला शांत करता येईना, तुम्ही कसले विश्वगुरू? राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

    मुंबई : गेल्या ७० दिवसांपासून धुमसलेलं मणिपूर तुम्हाला शांत करता येत नाही आणि इथे बसून तुम्ही जगाचे प्रश्न सोडवू इच्छिता, त्यांचे भक्त त्यांना विश्वगुरु म्हणवतात. त्यांना मला सांगायचंय आधी पेटलेलं मणिपूर शांत करा. मणिपूरचा विषय हा अत्यंत गंभीर आहे. मणिपूरच्या विषयावर ब्रिटनच्या संसदेत चर्चा होते. पण त्याच विषयावर जर आपल्या संसदेत प्रधानमंत्री चर्चा करु देत नसतील तर ती आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.

    दोन महिन्यांनंतरही मणिपूर राज्य धुमसतं आहे. दोन समाजात सुरू असलेल्या वादामुळे संपूर्ण राज्य पेटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्तक्षेपानंतरही मणिपूर शांत करण्यास केंद्र सरकारला यश मिळालेले नाही. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं.

    मणिपूरमध्ये ५४ जणांचा मृत्यू; सरकारच्या माहितीने हिंसाचाराची भयावहता समोर
    ते म्हणाले, मणिपूरमधल्या महिलेच्या नग्न धिंड प्रकरणावरुन संसद सुरु असताना पंतप्रधान मोदी संसदेबाहेर त्यावर प्रतिक्रिया देतात. याचा अर्थ ते संसदेला मानत नाहीत. नवी संसद कशासाठी उभी केली? अदानींवर चर्चा करत नाही, मणिपूरवर चर्चा करत नाही, भ्रष्टाचारावर चर्चा करत नाही, मग ती संसद हवी कशाला? मग तुम्ही पंतप्रधान कसले आहात? संसद आहे म्हणून तुम्ही पंतप्रधान आहात.. मणिपूर हा देशाचाच भाग आहे. मणिपूरची जनता या देशातलीच आहे. मणिपूरच्या एका महिलेला रस्त्यावर आणून तिला नग्न करुन मारलं जातंय. ही देशातल्या १४० कोटी जनतेसाठी चिंतेची गोष्ट आहे. समान नागरी कायदा आणताय ना.. आधी मणिपूरमधली कायदा आणि सुव्यवस्था सांभाळा, अशा शब्दात राऊतांनी मोदींना लक्ष्य केलं.

    Manipur Violence: मणिपूरमध्ये आरक्षणावरून हिंसाचार, लष्कराच्या ५५ तुकड्या तैनात; ‘शुट अ‍ॅट साईट’ची ऑर्डर
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक कृतीमागे त्यांचा राजकीय स्वार्थ असतो. स्वार्थाशिवाय पंतप्रधान आणि भाजप काहीही करत नाही. त्यांचा काय स्वार्थ आहे हे येणारा काळ सांगेन. पण संसदेचं अधिवेशन सुरु असताना मणिपूर प्रकरणावर मोदी संसदेत न बोलता संसदेच्या बाहेर बोलतात. संसदेत अदानींवर चर्चा करत नाही, मणिपूरवर चर्चा करत नाही, भ्रष्टाचारावर चर्चा करत नाही, मग ते नवं संसद भवन हवंय कशासाठी? असा उद्विग्न सवाल राऊतांनी विचारला.

    महाराष्ट्राची सत्ता देशबुडव्यांच्या हाती, भ्रष्टाचाऱ्यांची तातडीने चौकशी व्हावी; संजय राऊतांचा घणाघात

    Badlapur Crime : दिव्यांग असल्यामुळे नवरा अंथरुणावर, साडी न दिल्यानं बायकोचा राडा, चिमुकल्यासमोर बापालाच संपवलं; आईच्याविरोधात लेकरानं जबाब दिला
    ड्युटी संपली, तरी माणूसकीचं कर्तव्य निभावलं; वाहतूक पोलिसांचा बेशुद्ध कारचालकाला CPR, तत्परतेमुळे प्राण वाचले
    Crime News : रिक्षातून जाताना उचललं, जबरदस्ती गुड्डू भैय्याच्या थारमध्ये डांबलं, वाळूचं कमिशन न दिल्यानं संतापनजक प्रकार; नेमकं काय घडलं?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed