• Sat. Sep 21st, 2024
मंत्रिमंडळ विस्तारावरून चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले- आमचे प्राधान्य…

नागपूर: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला होणारा विलंब पाहुन उद्धव ठाकरे गटाने पुन्हा एकदा कोर्टात धाव घेतली आहे. पण सभापती स्वतः वकील आहेत. ते नियमानुसार निर्णय घेतील. राहिला प्रश्‍न उद्धव ठाकरेंचा तर उद्धव ठाकरेंना कधीही कुठेही जाण्याचा अधिकार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
अजित पवार सरकारमध्ये आले अन् महाराष्ट्राने असं काही केले जे आजवर देशात कधीच झाले नाही
अजित पवार यांच्या सरकारमध्ये आल्यानंतर त्यांच्या गटातील मंत्र्यांना कोणते खाते द्यायचे, याबाबत पेच निर्माण झाला आहे. अजित पवार गटाकडून महत्त्वाच्या मंत्रिपदाची मागणी केली जात आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना देऊ इच्छित नाहीत. त्याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वृत्तांवर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही विभागांसाठी नाही, राज्याला नंबर वन बनवायला आमचे प्राधान्य आहे. असे मंगळवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.

कांदेंचे वांदे, भुजबळांना कंटाळून शिंदे गटात गेले, पुन्हा भुजबळच बॉस म्हणून आले!

पवार गटातील मंत्र्यांनी खात्याबाबत चर्चा सुरू केल्याच्या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर आमदारांचा विश्वास आहे. महाराष्ट्राला नंबर वन बनवण्याला आमचे प्राधान्य आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले की, ही महाविकास आघाडी नसून महाआघाडी आहे. विविध विचारसरणीचे लोक राजकारणात एकत्र आले तर विकास सोपा होतो. शेवटी देशहिताचे काही निर्णय घ्यावेच लागतात.सरकारमधील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते कुशल नेते आहेत. कोणती खाती कोणाला मिळतात यापेक्षा मजबूत सरकार हे महत्त्वाचे आहे .कारण घरी बसून सरकार चालणार नाही. पालकमंत्रीपद कोणाला द्यायचे याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed