मुंबई : मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर सर्वत्र चांगला पाऊस झाला. अशात आजही हवामान खात्याकडून काही महत्त्वाच्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४ दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊस चांगला बरसेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग कोल्हापूर, सातारा, या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर पुणे आणि ठाण्यात हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग कोल्हापूर, सातारा, या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर पुणे आणि ठाण्यात हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
खरंतर, जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दाखल झालेला मान्सून मुंबईत जोरदार बरसला. अनेक शहरांमध्ये पाणी साठल्याच्या, घरात पाणी गेल्याच्या घटना समोर आल्या. पण आता गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. मुंबईत आज पावसाचा जोर काहीसा कमी दिसेल. मात्र, ५ जुलैपासून पुढील ३ दिवस मुंबईत मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्यात पुढील ४ ते ५ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. हवामान विभागाने आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर तर विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.