• Sat. Sep 21st, 2024
महत्वाची बातमी! ७ जुलैला कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, ‘या’ गाड्यांवर होणार मोठा परिणाम

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी ७ जुलै रोजी दुपारी १२.२० वाजल्यापासून ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ४ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून कोकण मार्गावर मालमत्ता देखभालीचे काम हाती घेण्यात येत आहे. वीर ते खेड विभागादरम्यान बुधवारी दु. १२.२० वाजता सुरू होणारा मेगाब्लॉक दुपारी ३.२० वाजता संपेल.

या मेगाब्लॉकमुळे ६ जुलै रोजी सुटणारी २०९१० क्रमांकाची पोरबंदर कोच्युवेली एक्स्प्रेस रोहा-वीर विभागादरम्यान १ तास ५० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. ६ जुलै रोजी सुटणारी १२४३२ क्रमांकाची थिरूअनंतरपुरम-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस रत्नागिरी-खेड विभागादरम्यान ३० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. ७ जुलै रोजी सुटणारी १६३४५ क्रमांकाची थिरूअनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेसही रोहा-वीर विभागात ३५ मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कुटुंब ताजमहाल पाहायला गेले, इकडे गाडीत निष्पाप जीव तडफडत होता; मग जे झालं त्याने सारेच हळहळले
दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी खास देवा येथून कोकणात मेमू स्पेशल गाडी सोडण्याचा निर्णय झाला आहे. दिवा ते चिपळूण मार्गावर दि. १३ सप्टेंबरपासून ३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे. पूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे मुंबईहून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. दिनांक १३ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत युवा चिपळूण मेमू स्पेशल गाडीच्या एकूण ३६ फेऱ्या होणार आहेत. दिवा ते चिपळूण मेमू स्पेशल ०११५५/०११५६ गाडी दिवा येथून ७ वाजून ४५ मिनिटांनी सुटून चिपळूणला ती १ वाजून २५ मिनिटांनी पोहोचणार आहे.

चिपळूणला आलेली मेमू स्पेशल गाडी दुसऱ्या दिवशी दिनांक १४ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दुपारी १ वाजता सुटून रात्री सात वाजता ती दिवा जंक्शनला पोहोचेल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान २८ जून पासून प्रवासासाठी सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला सलग दुसऱ्या दिवशी प्रतिसाद लाभल्यानंतर या गाडीच्या मडगाव ते मुंबई या दि. १ जुलै २०२३ रोजी झालेल्या दुसऱ्या नियमित फेरीलाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

आयुष्यातील नवीन प्रवास सुरु होतोय,आशीर्वाद घ्यायला आलो; राहुल कनाल साईंचरणी

गणेशोत्सव काळातही सोडण्यात येणाऱ्या वंदे भारत ट्रेनलाही तुफान प्रतिसाद मिळाला असून गणेशोत्सव काळातील वंदे भारतचे आरक्षण वेटिंग वर आहे. पूर्णपणे वातानुकुलित असलेल्या असलेल्या या ट्रेनमध्ये अत्याधुनिक एडव्हान्स यंत्रणा, लार्जेस्ट विंडो, ऑटो ओपन डोअर सिस्टीम, मुव्हिंग चेअर्स, यामुळे कोकणातील नैसर्गिक सौंदर्य पहात होणारा प्रवास हा प्रवाशांसाठी आनंददायी असा ठरत आहे. वंदे भारत एक्सप्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून या गाडीच्या तिकिटावरून टीका करणाऱ्यांना प्रवाशांनीच उदंड प्रतिसाद देत चोख उत्तर दिल्याच्या प्रतिक्रिया रेल्वेप्रेमी प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत. मुंबई सीएसएमटी येथून पहाटे सुटणाऱ्या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि मडगाव असे मोजकेच थांबे देण्यात आले आहेत. १५ ऑगस्ट या दिवसाचे वंदे भारत एक्सप्रेसच्या बुकिंगलाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed