• Thu. Mar 12th, 2026
    पुण्याला जाऊन ५००० पाठवतो, घर सावरण्यासाठी नोकरीच्या शोधात निघालेल्या निखिलला वाटेतच…

    यवतमाळ: गेल्या काही दिवसांपासून अपघातांचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या समृद्धी महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला आहे. विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता बैद्यनाथ चौकातून रवाना झाली होती. आज पहाटे १ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास बुलढाण्यातील पिंपळखुटा परिसरात ही खासगी बस खांबाला धडकून उजव्या बाजूच्या संरक्षक कठड्यावर आदळून पलटी झाली. त्यानंतर या बसने पेट घेतला. यामध्ये बसमधील २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या २६ प्रवाशांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामध्ये यवतमाळच्या निखिल पाथे या तरुणाचाही समावेश होता. नोकरीच्या शोधात पुण्याला जायला निघालेल्या निखिलला वाटेतच मृत्यूने गाठल्याने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

    Samruddhi Mahamarg: अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास लोकं बोलतात तो ‘देवेंद्रवासी’ झाला: शरद पवार

    निखिल पाथे हा बाभूळगाव तालुक्याच्या गोंधळी गावातील रहिवासी होती. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे निखिलने नोकरीच्या शोधात पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. पुण्यात नोकरी मिळाल्यानंतर ५००० रुपये घरी पाठवेन, असे सांगून तो विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसने पुण्याला निघाला होता. निखिलचा भाऊ हर्षद पाथे याने अपघातानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी हर्षद याने सांगितले की, निखिल नोकरीसाठी पुण्याला जात होता. काल संध्याकाळी आम्ही त्याला बसमध्ये बसवून दिले. त्याचं ग्रॅज्युएशन झालं होतं. काल संध्याकाळी त्याला बसमध्ये बसताना पैसे हवे होते. पण तेव्हा माझ्याजवळ कॅश नव्हती. मी त्याला म्हणालो की, तू पुण्याला जा, मी उद्या सकाळी तुला पैसे पाठवतो. यानंतर आज सकाळी मी निखिलला पैसे पाठवण्यासाठी फोन केला. त्यावेळीच बुलढाण्यातील अपघातात बस जळून खाक झाल्याची बातमी मला समजली. यानंतर बाकीच्यांचे फोन येण्यास सुरुवात झाली आणि अपघातामध्ये निखिलचा मृत्यू झाल्याचे आम्हाला समजले, असे हर्षद पाथे याने सांगितले.

    दत्तक घेतलेल्या लेकीला घेऊन प्रवासाला निघाले, बुलढाणा अपघातात लहानग्या ओवीसह आई-आजीचा मृत्यू

    समृद्धी महामार्गावर झालेली घटना ही दुर्दैवी: अशोक चव्हाण

    समृद्धी महामार्गावर झालेली घटना ही दुर्दैवी आहे. अपघात मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे, अशी प्रतिक्रिया देत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मृत्यू झालेल्याना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान समृद्धी महामार्गचे एव्हढ्या घाईने उदघाटन करण्याची गरज नव्हती. गाड्या अतिशय वेगाने जात आहेत. कुठलीही उपाय योजना न करता,अशी होणारी सुरुवात ही चुकीची आहे. या मार्गावर प्रतिबंधक उपाय योजना करण्याची गरज आहे.या मार्गावर अनेक अपघात झालेले आहेत. त्यामुळे लोकांच्या जीवाशी न खेळता सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा.अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. कुठलेलंही राजकारण आम्हाला यात आणायचं नाही आणि कुणी आणू पण नये. परंतु लोकांचे या मार्गावर होणारे मृत्यू हे गंभीर बाब आहे. त्यामुळे या मार्गावर आवश्यक ते उपाय सरकारने तातडीने केले पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

    समृद्धी महामार्गावरील अपघाताआधी विदर्भ बस यवतमाळला थांबली तेव्हाची दृश्य

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed