• Sat. Sep 21st, 2024
आई, ज्वारीचं चिपाड न् कापलेली नाळ; पीएचडी मिळवणाऱ्या मेंढपाळ पुत्राचं भाषण व्हायरल

पुणे: आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एडिनबर्ग विद्यापीठातून पीएचडीची ऑफर आलेला बुलढाण्यातील खामगावचा सौरभ हटकर हा युवक बारामतीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त उपस्थित होता. यावेळी बोलताना त्याने आपला संघर्ष समाज बांधवासमोर मांडला. दरम्यान, सौरभने घणाघाती भाषण करत मेंढपाळ समाजाची व्यथा व्यासपीठावरील नेत्यांसमोर कथन केली.

यावेळी बोलताना सौरभ म्हणाला की, माझे कॉम्प्युटर सायन्स या विषयात इंजिनीरिंग झालं त्यानंतर मी टाटा इन्स्टिटयूट ऑफ सायन्सेस या ठिकाणी प्रवेश घेतला. याच टाटा इन्स्टिट्यूटने धनगर आरक्षणाचा सर्व्हे केला होता, ही संस्था दक्षिण आशियातील एक क्रमांकाची संस्था म्हणून गणली जाते त्या संस्थेतून मी यावर्षी पासआऊट झालो. नुसता या संस्थेतून पासच नाही झालो तर जगातील १५ व्या नंबरच्या एडिनबर्ग या विद्यापीठात पीएचडी करण्यासाठी मला ऑफर आल्याचे त्याने सांगितले.

दर्शना पवारचा धक्कादायक मृत्यू, शेवटचं भाषण सोशल मीडियावर व्हायरल

एका मेंढपाळाचा मुलगा वाड्या- वस्त्या पासून इंग्लंड- लंडनपर्यंत जाऊ शकतो ही शिक्षणाची प्रेरणा मला बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. शिक्षणाच्या बळावरती मेंढक्याच्या वाड्यावरून एक मेंढपाळाच पोरगं अशा व्यासपीठावर येऊ शकतं हे फक्त शिक्षणामुळेच होऊ शकतं. याच शिक्षणाची प्रेरणा माझ्या मेंढपाळ बांधवाना मिळायला पाहिजे त्यासाठी मी या ठिकाणी आलो असल्याचे सौरभने स्पष्ट केले.

ज्या अहिल्यामातेची जयंती आपण साजरी करत आहोत त्या मातेच्या कार्यकाळाकडे पाहिल्यावर लक्षात येतं की, त्या खऱ्या अर्थाने सर्वधर्मीय समाजाच्या नेत्या होत्या. अहिल्याबाईंचा राज्य माळव्यात असतानाही त्यांनी संबंध देशभर मंदिरांच्या जीर्णोद्धाराची काम केली. भारताची राष्ट्रसंकल्पना १९४७ नंतर अस्तित्वात आली पण त्यापूर्वीच अहिल्याबाईंनी आपल्या राज्यकारभारातून साहित्यिक संस्कृतीवाद उभा करण्याचं काम केल्याचे सौरभने सांगितले. आज अहिल्याबाईंना एका धर्मापुरतं मर्यादित केले आहे. परंतु जेव्हा अहिल्याबाईंनी बांधलेल्या बाराववर हिंदू पाणी प्यायचे, मुस्लिम पाणी प्यायचे एवढंच काय तर इंग्रजही पाणी प्यायचे कारण अहिल्याबाईंनी कधी धर्माच्या नावावर राजकारण केले नाही असे म्हणत त्याने राजकीय नेत्यांना आरसा दाखवला.

आधी समाजासाठी संघर्ष; आता घेणार जगविख्यात विद्यापीठात शिक्षण, बुलढाण्याच्या मेंढपाळ पुत्राची गगनभरारी
घरच्या परिस्थितीबद्दल बोलताना सौरभ भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. तो म्हणाला की जेव्हा मला माझ्या आईने तुझा जन्म घरात झाला त्यामुळे तू किती भाग्यवान आहे हे सांगितलं तेव्हा मी भाग्यवान कसा असं आईला विचारलं असता, ती म्हणाली की तुझ्या भावंडांचा जन्म कोणच्यातरी रानात झाला. तूच असा आहे की ज्याचा जन्म घरात झाला. यानंतर मी आईला विचारले की माझ्या जन्मावेळी कोणती परिचारिका होती तुझी नाळ कापायला. तर आई म्हणाली की वाडीवरील महिलांची जेव्हा डिलिव्हरी व्हायची तेव्हा ती नाळ विळ्याने कापली जायची. कधी विळा गांजलेला असल्याने धनुर्वात होत असे म्हणून तुझ्या जन्मावेळी ज्वारीच्या चिपाडाने मी नाळ कापल्याचे सौरभने सांगितले.

मी फक्त शिक्षणाने पुढे जात नसून मेंढपाळ बांधवांच्या समस्यांसाठी मी तीन मोठी आंदोलन केली आहेत असे सौरभ म्हणाला. १९ डिसेंबरला मी १० हजार मेंढपाळ घेऊन नागपूर येथे बसलो होतो. आमची फक्त एकच मागणी होती की आमच्या समाजातील मुलांना शिक्षणाचे दरवाजे खुले करा. वीज पडून मेंढपाळांचा कोळसा व्हायला लागला तरी त्यांच्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही. सरकार मेंढरं चारायला १० हजार कोटीच्या योजना देत असल्याचं सांगतं पण आमच्या मेंढरांना चरण्यासाठी राखीव जंगलदेखील नाही. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या काळातही राज्यातील मेंढपाळांना मेंढ्यांचे चराईकरण करत असताना गुन्हेगार ठरवणारा कायदा अजूनही रद्द करण्यात आला नसल्याकडे त्याने लक्ष वेधले.

Success Story : वडिलांनी ऊस तोडून संसार उभा करत शिकवलं, मुलींनी कष्टाचं पांग फेडलं,तिन्ही लेकी पोलीस दलात भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed