पंतप्रधान मोदींच्या या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. पवार म्हणाले की, पंतप्रधानांनी देशवासियांबद्दल काय बोललं पाहिजे याचा नमुना देशासमोर ठेवला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी स्वतः विचार करण्याची गरज आहे. शिखर बँकेचा त्यांनी उल्लेख केला. मी कधी शिखर बँकेचा मेंबर नव्हतो. मी शिखर बँकेतून कधीही कर्ज घेतले नाही. मी त्या संस्थेचा कधीच सदस्य नव्हतो. याबाबत बोलणे कितपत ठीक आहे? त्यांनी जो उल्लेख केला त्यात शिखर बँक हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यात माझा शिखर बँकेसोबत काही संबंध नाही हे स्पष्ट झालेले आहे. सुप्रिया सुळे यांचे नाव घेण्याचे काहीही कारण नाही. अशा इन्स्टिट्यूट सोबत त्या राहत नाहीत हे बहुतांश लोकांना माहीत आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर देशातील विरोधी पक्षाचे लोक एकत्र येतात. देशाच्या सम
स्येबाबत चर्चा करतात ही गोष्ट काही लोकांना पटत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे विधाने केली जातात. यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही.
यावेळी शरद पवारांनी बीआरएसमध्ये प्रवेश करणाऱ्या भगीरथ भालकेंवरही त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, एखादी व्यक्ती गेली तर फार चिंता करायची गरज नसते. भालके यांना आम्ही ज्या वेळेला विधानसभेला संधी दिली त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं होतं की आमची ही निवड चुकीची होती. त्याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. तसेच केसीआर यांच्यावर बोलताना पवार म्हणाले, शेजारच्या राज्याचे मुख्यमंत्री इथे आले दर्शनासाठी त्यावर हरकत घ्यायचं काही कारण नाही. परंतु जे काही विठ्ठलाची पूजा हा वेगळा भाग पण त्याशिवाय जे काही जबरदस्त ताकद दाखवण्याचा प्रयत्न शेकडो गाड्या आणि बाकीच्या इतर गोष्टी हे चिंताग्रस्त आणि वादग्रस्त आहे.