येत्या ३-४ दिवसांत विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, अशा परिस्थितीत विदर्भातील जनतेला उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. तर आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.
पालघरमध्ये यलो अलर्ट…
हवामान खात्याकडून पालघर जिल्ह्याला मंगळवारपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, शनिवार ते मंगळवार रायगड, रत्नागिरी इथे विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गातही सोमवारपर्यंत विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. त्यामुळे आता मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, असे म्हणता येईल.
पुण्यात मान्सून बरसला…
आज सकाळपासून पुण्यात पावसाच वातावरण आहे. त्यासोबतच पाऊस गेल्यानंतरही ढगाळ वातावरण शहरात पाहायला मिळत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार महराष्ट्रात मान्सूनच आगमन झाल आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या शहरात पावसाची सुरुवात झाली आहे. विदर्भाच्या भागात देखील पावसाला चांगली सुरवात झाली आहे. तर येत्या ४८ तासात राज्यातल्या सगळ्याच भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
