• Fri. Mar 13th, 2026
    दीडशे वर्ष जुने चिंचेचे झाड पाडले; जखमी पक्ष्यांचा करुण चिवचिवाट,इंदापुरात संतापाची लाट

    इंदापूर:इंदापूर नगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे अभिन्न अंग असणारे पुरातन चिंचेचे झाड इंदापूर नगर परिषदेकडून जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. चिंचेच्या या महाकाय वृक्षावर वास्तव्य करणाऱ्या अनेक चित्रबलाक आणि वटवाघुळ या पक्ष्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पक्ष्यांचा मृत्यू आणि वृक्ष पाडण्याची कारवाई इंदापूर शहरात सध्या वादाचा विषय ठरला आहे.

    इंदापूरमधील गढीच्या उत्तरेला असणारा हा चिंचेचा महाकाय वृक्ष सुमारे दीडशेहून अधिक वर्षांचा होता. झाडावर चित्रबलाक या परदेशी पक्ष्यांचा शेकडो वर्षापासूनचा रहिवास आहे. गढीच्या कडेला असणारे हे झाड काल नगरपरिषदेने जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आले. झाड पाडताना जेवढे पक्षी उडून गेले तेच वाचले. झाडावरील इतर पक्षी त्यांची घरटी आणि त्यातील पिल्लं झाड पाडल्यानंतर झाडाच्या ओझ्याखाली अक्षरश: चिरडून गतप्राण झाले.

    ऑफिस बाहेर जखमी पक्षी पाहिला, मदत करण्यासाठी टोल फ्री नंबरवर कॉल केला आणि बसला झटका
    जखमी झालेले जिवंत पक्षीही पालिकेने येथील कचरा डेपोच्या कचऱ्यात मातीआड केल्याचा येथील नागरिकांचा आरोप आहे. सदर वृक्ष पाडल्याची आणि त्यात अनेक पक्षी मृत्यूमुखी पडल्याची माहिती येथील पक्षीप्रेमी नागरिक व नागरी संघर्ष समितीचे पदाधिकारी तसेच वनविभागाशी संलग्न असणाऱ्या रेस्क्यू टीमला समजली. त्यानंतर त्यांनी रात्री येथील संपूर्ण कचरा डेपो धुंडाळला असता त्यांना कचरा डेपोत आठ चित्रबलाक पक्षी जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. किरकोळ जखमी दोन चित्रबलाक पक्ष्यांवर उपचार करून वनविभागाने त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.

    १०० हून अधिक विदेशी पक्षी पुणेकरांच्या भेटीला; भव्य प्रदर्शन, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

    मृत ८ पक्ष्यांना मूठमाती देण्यात आली. दरम्यान, झाड तोडण्याची कारवाई करून पक्षांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधित सर्वांवर कारवाई करण्याची मागणी इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे निमंत्रक प्रा. कृष्णा ताटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदनाद्वारे इंदापूर पोलिसांकडे केली आहे.

    पुढच्याच महिन्यात हे पक्षी आपल्या मूळ प्रदेशात स्थलांतरित झाले असते. आत्ता मात्र ते जगातूनच कायमचे निघून गेले आहेत. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ अशा शब्दात पर्यावरणाचे महत्व सांगणा-या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगातील सुस्वरे आळवण्याऱ्या निप्षाप पक्षांच्या कंठातील प्राण नगरपरिषदेच्या कठोर कारवाईने हिरावून घेतले आहेत. सुमारे दीडशे वर्षे जुने चिंचेचे झाड पाडून झाडासह झाडावर राहणाऱ्या पक्ष्यांचा बळी घेणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी इंदापूर शहरातील नागरिकांनी व नागरी संघर्ष समितीने केली आहे.

    Nagpur News : नागपूरच्या नेहा मूनने राबवली अनोखी संकल्पना ; ‘प्रोजेक्ट विंग्ज’ मार्फत केला जनजागृतीचा प्रयत्न

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *