• Sat. Sep 21st, 2024

पाण्यानेच ‘जीवन’ हिरावलं, आईच्या डोळ्यादेखत तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

पाण्यानेच ‘जीवन’ हिरावलं, आईच्या डोळ्यादेखत तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

बुलढाणा : सध्या जून महिना अर्ध्यापेक्षा जास्त संपून गेला, तरी मृग नक्षत्राचा पाऊस बरसलेला नाही. शेतासोबत सामान्य गावकरी देखील पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आता पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळेच एका बालकाला जीव देखील गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे ही घटना १५ जून रोजी घडली आहे. आईसोबत नळावर पाणी आणण्यासाठी जात असलेल्या तीन वर्षीय बालकाला दुचाकीने धडक दिली. या अपघातात चिमुरड्याचा जागेवरच मृत्यू झाला. पाण्याच्या टाकीपासून अवघ्या काही अंतरावर हा प्रकार घडला.

स्थानिक गजानन नगर भागातील रहिवासी कुलदीप जाधव यांची पत्नी, आपला तीन वर्षांचा मुलगा निर्वाणला घेऊन नळावर पाणी आणण्यासाठी जात होती. दरम्यान याच भागातील रहिवासी अल्टमेश अजिज खान यांनी निष्काळजीपणे व भरधाव दुचाकी चालवून चिमुकल्याला धडक दिली. त्यात निर्वाणचा जागीच मृत्यू झाला.

पहिल्या नवऱ्याला कर्जात बुडवलं, त्याने जीव देताच मामाला पटवलं, मयत अप्सराची कुंडली समोर
याबाबत निर्वाणचे काका संदीप रमेश जाधव यांनी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यावरून पोलिसांनी दुचाकी चालक अल्टमेश अजीज खान यांच्या विरुद्ध कलम २७९, ३०४ अ आयपीसीसह कलम 184, 135 मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सेलोटेपमध्ये गुंडाळलेल्या महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकललं, आरोपी निघाला विवाहितेचाच…

ग्रामीण भाग असो की शहरी भाग, अनेक जणांना घरापासून बऱ्याच अंतरावर पायपीट करून पाणी आणावे लागते. घरामध्ये लहान मूल बाळ असेल, तर त्यांना एकट्याला घरी न ठेवता त्याला देखील सोबत न्यावे लागते आणि अशातच अशा प्रकारच्या काही घटना घडतात.

काही वेळा विहिरीमध्ये देखील पडून लहान मुलांचा किंवा मोठ्या व्यक्तीचा मृत्यू होतो. पाणी मिळवण्याच्या धडपडीमध्ये आपला जीव गमावून बसावे लागते. आजही अनेक ग्रामीण भागात टँकरच पाण्याचे मुख्य स्त्रोत आहेत. ते दैनंदिन जीवनाचा एक भाग झालेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed