ग्राहकांना दिलासा देण्याचा उद्देश
‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ एकूण तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असून, भाव वाढावा म्हणून ‘नाफेड’ खरेदी करीत नसून कांद्याचे किरकोळ बाजारात भाव वाढल्यास ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ग्राहक व्यवहार विभाग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत कांद्याची खरेदी केली जात आहे.
उमराणेत औपचारिक उद्घाटन
या समारंभास आमदार डॉ. राहुल आहेर, कांदा उत्पादक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित राहतील. ‘नाफेड’ व भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ३ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार आहे.
जिल्ह्यातून ८० टक्के कांद्याची उलाढाल
महाराष्ट्रात यावेळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात पीक आले आहे. नाशिक जिल्ह्यात राज्यातील ८० टक्के कांदा खरेदी-विक्री केला जातो. याचा परिणाम कांदा दरांवर होतो आहे. दर घसरल्याने शेतकऱ्यांना कांदा कमी दराने विक्री लागत होता. या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी उपभोक्ता मामले खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडेदेखील पाठपुरावा केला असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कळविले आहे.