आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत फक्त गुलाबी झेंडा फडकवणारच असा विश्वास या वेळी अभय चिकटगावकर यांनी व्यक्त केला. ऑनलाइन सदस्य नोंदणी करून प्रत्येक गावात शाश्वत यंत्रणा उभी करू, असे त्यांनी सांगितले. या वेळी ‘बीआरएस’चे चंद्रशेखर साळुंखे, भास्कर मतसागर प्रभाकर कोकाटे, नवनाथ पवार, अबू पठाण, संदीप गाजरे, अरुण शेळके, दीपक लाड, अशोक भाडाईत, सोन्याबापू मराठे, बाळू शेळके, सोमनाथ रोठे, पारसनाथ डमाळे, रामकृष्ण रोठे, तुकाराम पवार, मंगल शेलार, रमेश त्रिभुवन, कारभारी त्रिभुवन आदी उपस्थित होते.
तेलंगणा राज्यातील भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस या पक्षाचे जिल्ह्यातील पहिले संपर्क कार्यालय वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे शनिवारी सुरू करण्यात आले.