• Wed. Mar 11th, 2026
    तारीख ठरली! मुंबईला मिळणार देशातला सगळ्यात मोठा समुद्री सेतू, फक्त ९० मिनिटांत पुण्यात टच…

    मुंबई : मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक (MTHL)हा देशातला सगळ्या लांब सागरी पूल २५-२६ मे पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना मोठं गिफ्ट मिळणार आहे. १६.५ किमी लांबीचा हा पूल ओपन रोड टोलिंग प्रणाली (ORT) असलेला भारतातला पहिला पूल असणार आहे. त्यामुळे मध्य मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील चिर्ले हा प्रवास अवघ्या १५ ते २० मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे.टाईम्सच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, पुलाच्या डेकचं काम पूर्ण झाल्यानंतर वाहनांना वाहतूकीची परवानगी देली जाईल. या पूलाची एकूण लांबी २२ किमी असणार आहे. ज्यामध्ये ५.५ किमी जमिनीवरील नाल्यांना जोडण्यात आलं आहे. तर समुद्रावरील पुलाची लांबी ही १६.५ किमी असेल. या पुलावरून दोन्ही दिशांना दररोज तब्बल ७० हजार वाहने ये-जा करतील. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

    चुकीला माफी नाही! पोलिसाने केली अशी चूक, कैद्याने झाडूने बदडलं; बेदम मारहाणीचा VIDEO समोर

    रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी होणार…

    लोकांची वाढती गर्दी आणि त्यामुळे रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी हा सागरी पूल तयार करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. त्यामुळे भविष्यात लोकांचा मुंबई प्रवास आणखी सुखकर होणार आहे.

    पूल बांधण्यासाठी किती खर्च आला….

    दरम्यान, या पुलावर ६ लेन रस्ते आणि २ आतत्कालीन मार्ग आहे. जे मुंबईच्या दिशेने शिवडी आणि मुख्य भूमीवरील नवी मुंबईच्या चिर्ले ते बंदरादरम्यान पसरलेले आहेत. पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पूल बांधण्यासाठी तब्बल १८००० कोटी रुपये खर्चण्यात आले आहेत. अधिक माहितीनुसार, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून कर्ज घेऊन हा प्रकल्प डिझाइन आणि बिल्ड करण्यात आला आहे. या डेकच्या उद्घाटनानंतर, मुंबईच्या इतर प्रकल्पांप्रमाणे एमएमआरडीए यावर लक्ष देईल. जसं की सीसीटीव्ही कॅमेरे, लॅम्पपोस्ट आणि टोल इन्फ्रास्ट्रक्चरची स्थापना करेल.

    MTHL : शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर टोलसाठी फॉरेनची टेक्निक, भारतात पहिल्यांदाच भन्नाट पद्धत

    मुंबईवरून पुणे गाठता येणार फक्त ९० मिनिटांत…

    मुंप्रस्तावित कॉरिडॉरमुळं मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूककोंडीची समस्या सुटेल. तसंच, मुंबईतून अवघ्या ९० मिनिटांत पुणे गाठता येणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमार्ग राष्ट्रीय महामार्ग ३४८ येथील चिर्ले येथे संपतो. NH-३४८ येथे मोठे ट्रक आणि कंटेनरमुळे नेहमीच वाहतूक कोंडी असते. तसेच जेएनपीटी पोर्टमुळं ही वाहतुकीची समस्या कायम असते. म्हणून NH-३४८ ला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जोडण्यात येत आहे. यामुळे इथली वाहतूक कोंडीची समस्या सुटेल.

    Thane Fire : हायटेन्शन वायरचा पत्र्याला स्पर्श, मुंबईत २ घरांमध्ये आगीचा भडका; २ लहान मुलांसह ४ जण जखमी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *