रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी होणार…
लोकांची वाढती गर्दी आणि त्यामुळे रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी हा सागरी पूल तयार करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. त्यामुळे भविष्यात लोकांचा मुंबई प्रवास आणखी सुखकर होणार आहे.
पूल बांधण्यासाठी किती खर्च आला….
दरम्यान, या पुलावर ६ लेन रस्ते आणि २ आतत्कालीन मार्ग आहे. जे मुंबईच्या दिशेने शिवडी आणि मुख्य भूमीवरील नवी मुंबईच्या चिर्ले ते बंदरादरम्यान पसरलेले आहेत. पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पूल बांधण्यासाठी तब्बल १८००० कोटी रुपये खर्चण्यात आले आहेत. अधिक माहितीनुसार, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून कर्ज घेऊन हा प्रकल्प डिझाइन आणि बिल्ड करण्यात आला आहे. या डेकच्या उद्घाटनानंतर, मुंबईच्या इतर प्रकल्पांप्रमाणे एमएमआरडीए यावर लक्ष देईल. जसं की सीसीटीव्ही कॅमेरे, लॅम्पपोस्ट आणि टोल इन्फ्रास्ट्रक्चरची स्थापना करेल.
मुंबईवरून पुणे गाठता येणार फक्त ९० मिनिटांत…
मुंप्रस्तावित कॉरिडॉरमुळं मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूककोंडीची समस्या सुटेल. तसंच, मुंबईतून अवघ्या ९० मिनिटांत पुणे गाठता येणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमार्ग राष्ट्रीय महामार्ग ३४८ येथील चिर्ले येथे संपतो. NH-३४८ येथे मोठे ट्रक आणि कंटेनरमुळे नेहमीच वाहतूक कोंडी असते. तसेच जेएनपीटी पोर्टमुळं ही वाहतुकीची समस्या कायम असते. म्हणून NH-३४८ ला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जोडण्यात येत आहे. यामुळे इथली वाहतूक कोंडीची समस्या सुटेल.
