• Sat. Sep 21st, 2024
त्या दोघींचं लग्न आहे… हेल्पलाइनचा फोन वाजताच चक्र फिरली, पथक घरी धडकलं अन् कुटुंबानं…

जालना : महाराष्ट्रात सध्या बालविवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकाच दिवशी २ बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण समितीला यश आलं आहे. बाल संरक्षण कक्षाच्या दक्षतेमुळे जालना जिल्ह्याच्या परतूर व जाफराबाद तालुक्यात काल दिनांक १६ मंगळवारी होणारे दोन बालविवाह रोखण्यात मोठे यश आले आहे. सध्या जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची जनजागृती केली जात आहे.

जालना जिल्ह्यात कुठेच बालविवाह होऊ नये यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली असल्याने जिल्ह्यात बालविवाह थांबवण्यात मोठे यश येत आहे. चाईल्ड हेल्पलाइन १०९८ या क्रमांकावर बालविवाह होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती.तक्रार प्राप्त होताच त्याची माहिती घेऊन मंगळवारी दिनांक १६ मे रोजी परतूर तालुक्यातील कनकवाडी तांडा तसेच जाफराबाद तालुक्यातील म्हसरुळ येथे बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली होती.

या माहितीची तत्काळ दखल घेऊन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी,पोलीस प्रशासन यांना कळविले.दोन्ही ठिकाणी जाऊन माहिती घेत वधू आणि वर यांच्या वयाची खात्री केली असता एका बालिकेचे वय १६ वर्ष आणि एका बालिकेचे वय १४ वर्ष असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.
आलेच सर्वाधिक तेजतर्रार; कापूस सोयाबीनकडून अपेक्षाभंग, आल्यामुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन; जाणून घ्या दर
यावेळी संबंधित ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तसेच गाव बाल संरक्षण समिती यांनी संबंधित कुटुंबाची भेट घेऊन बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे, याबाबत समुपदेशन केले. तसेच बालविवाह करण्यापासून कुटुंबाला परावृत्त करण्यात आले आणि अठरा वर्षे होईपर्यंत मुलीचे लग्न होणार नाही, अशा प्रकारची समज कुटुंबाला देण्यात आली.

Sanjay Raut: त्र्यंबकेश्वरच्यानिमित्ताने महाराष्ट्रातील सलोखा बिघडवण्याचा योजनाबद्ध डाव; राऊतांचा गंभीर आरोप
दोन्ही मुलींना त्यांच्या आई-वडिलांसह बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. बालकल्याण समितीने या कुटुंबाचे समुपदेशन केले व बालविवाह करणार नाही याबाबतचे हमीपत्र लिहून घेतले. ही कारवाई जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे, संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण, समुपदेशक सुरेखा सातपुते, संबंधित ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, गाव बाल संरक्षण समिती आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांनी केली.
मविआच्या लोकसभा निवडणूक समितीत संजय राऊतांचं नाव फिक्स, दुसरा नेता कोण असणार, उद्धव ठाकरे कुणाला संधी देणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed