• Sat. Sep 21st, 2024
४ महिन्यांपासून प्लॅन, बंदूक हरवल्याचं नाटक, सुपारी दिली, आरोपींनी पोलिसांना काय सांगितलं?

पुणे : पुण्याच्या तळेगाव येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून प्रकरणात एक एक नवे खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी २४ तासांत ५ आरोपींना बेड्या ठोकून हत्याकाडांचा तपास सुरु केला. या तपासात आवारे यांच्या खुनाचा कट कशा पद्धतीने रचला, याचं कथन आरोपींनी पोलिसांसमोर केलं.

मित्रांच्या मदतीने हत्या, सुपारी दिली?

किशोर आवारे यांनी माजी नगरसेवक भानू खळदे यांच्या सर्वांदेखत कानशिलात लगावली होती. वडिलांचा झालेला अपमान जिव्हारी लागल्याने इंजिनिअर गौरव अस्वस्थ होता. त्याच्या मित्रांनी यावरुन कित्येकदा गौरवला डिवचलं होतं. त्याने आवारे यांचा काटा काढायचा ठरवलं. याचा प्लॅन सुमारे चार महिन्यांपासून शिजत होता.

अण्णांशी संघर्ष, भाऊंशी जवळीक, तळेगावात भल्याभल्यांना नडणाऱ्या किशोर आवारेंची गोष्ट
जानेवारी २०२३ पासून किशोर आवारे यांच्या हत्येचं प्लॅनिंग सुरु होतं. मागील महिन्याभरापासून आरोपी आवारे यांची रेकी करत होते. शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची हत्या झाली, त्यावेळी आवारे मावळ न्यायालयात जात होते. त्याचवेळी खरंतर त्यांचा काटा काढायचा प्लॅन ठरला. पण खूप गर्दी असल्याने तो प्लॅन फिस्कटला. तिथे आरोपींनी आवारे यांना मोबाईल नंबर मागण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आवारेंना काहीतरी शिजत असल्याचा संशय आला. काहीतरी अघटित होतंय, याची कुणकुण आवारेंना लागली. त्यावेळी त्यांनी तिथून काढता पाय घेतला.

जसं आवारेंना मारलं, तसं अण्णांच्या भावालाही संपवलं होतं, तो रक्तरंजित इतिहास पुन्हा ताजा
बंदूक हरविल्याचं नाटक, त्याच काडतुसांचा हत्या प्रकरणात वापर!

मग मात्र सगळं प्लॅनिंगनुसार करायचं ठरलं. मुख्य सुत्रधार गौरव खळदे याचे वडील भानुदास खळदे यांच्याकडे परवाना असलेले पिस्तुल होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी काडतुसांसह पिस्तुल हरविल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. मात्र आवारे खून प्रकरणात त्याच हरविलेल्या काडतुसांचा वापर झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग असणाऱ्या पाच जणांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. आरोपींची कसून चौकशी केली असता गौरव खळदे यानेच काडतुसे पुरवल्याची माहिती समोर आले आहे.

पोलिसांनी सूत्रे फिरवली, २४ तासांच्या आत कारवाई, आवारेंच्या खून प्रकरणात ५ आरोपींच्या मुसक्या आवळल्या
खळदे आणि आवारे यांच्यात नेमका काय वाद झाला होता?

माजी नगरसेवक भानू खळदे यांनी वृक्षतोड केली होती. हीच बाब किशोर आवारे यांना खटकली. त्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती. याचवेळी आवारे आणि खळदे यांच्यात मोठा वाद झाला. वादाचं रुपांतर हमरातुमरीत झाली. त्याचवेळी आवारेंनी खळदेंच्या श्रीमुखात भडकवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed