• Sat. Sep 21st, 2024

जे कोणी दंगलीत तेल ओतत असतील त्यांना सोडणार नाहीत; देवेंद्र फडणवीसांचा सज्जड इशारा

जे कोणी दंगलीत तेल ओतत असतील त्यांना सोडणार नाहीत; देवेंद्र फडणवीसांचा सज्जड इशारा

पिंपरी : राज्यात दोन ठिकाणी दंगली झाल्या. या दंगली कुणीतरी जाणूनबुजून निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या ठिकाणी दंगली झाल्या. त्या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आहे. पण जे कुणी दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना अद्दल घडवणार आहे. जे कोणी आगीत तेल ओतण्याचे काम करत असतील तर त्याला सोडणार नाही, पण राज्यात दंगली घडू देणार नाही, अशी तंबीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

पिंपरी चिंचवड येथे विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आहेत. आमदार उमा खापरे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर देखील संवाद साधला. १६ आमदाररांच्या अपात्रेबद्दल फडणवीस यांनी सांगितले की, विधानसभा अध्यक्षाबाबत जी काही भाषा वापरली जाते, ती कुठे लोकशाहीला धरून आहेत. विधान सभा अध्यक्ष हे चांगले वकील आहेत. कायद्याचे त्यांना चांगले ज्ञान आहे. ते कुठलेही बेजबादारीचे काम करणार नाहीत, अध्यक्षांवर कुणी कितीही दबाव आणला तरी ते कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.

Akola Violence: वादग्रस्त पोस्टवरून दोन गटात तुफान राडा, एकाचा मृत्यू; अकोल्याला छावणीचं स्वरूप

अकोला शहरातील जूने शहर पोलीस स्टेशन हद्दीत काल रात्री दोन गटात तुफान दगडफेक झाली. सोशल मीडियावर व्हायरल मेसेजमुळे अकोल्यातील जुन्या शहरात शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास झालेल्या दंगलीत जमावाने जाळपोळ; तसेच दगडफेक केली. दोन्ही समुदायांचे गट रस्त्यांवर उतरले होते.

Ahmednagar News : शेवगावमध्ये दगडफेक, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीमार, परिस्थिती नियंत्रणात

वांद्रे-वर्सोवा सी लिंकला वीर सावरकरांचं नाव द्या: देवेंद्र फडणवीस

मुंबईतील वांद्रे वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव द्या, अशी मागणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव दिलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी १३ मार्चला मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते. या पत्रात कोस्टल रोड, वांद्रे-वर्सोवा सी लिंक आणि ट्रान्सहार्बर लिंकला नवी नावं देण्यात यावीत अशी मागणी फडणवीसांनी केली होती. त्यापैकी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले आहेत. आता देवेंद्र फडणवीसांच्या इतर दोन मागण्या मुख्यमंत्री कधी मान्य करणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

एवढं घाबरायचं काय? नोटीस आली तर तोंड द्या ना; पडळकरांचा जयंत पाटलांना टोला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed