• Sat. Sep 21st, 2024
कठडा तोडून पिकअप पुलावरुन थेट रेल्वे ट्रॅकवर आदळली, लोको-पायलटनं ब्रेक दाबला अन्… नाशकात थरार

नाशिक : इगतपुरी घोटीदरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावरील बोरटेंभे शिवारात रेल्वे पुलावरून एक पिकअप वाहन पुलाचा कथडा तोडून थेट रेल्वे रूळावर आदळले. यात जीवितहानी झाली नसली तरी दोघे जण जखमी झाले. सुदैवाने यावेळी भुसावळ – इगतपुरी मेमू रेल्वेगाडी येत असताना येथे हजर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी गाडीला लाल झेंडा दाखवत मेमोच्या दिशेने पळत सुटले. यावेळी मेमू चालकाने रेल्वे थांबवल्यामुळे मोठी जिवितहानी टळली.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल शनिवारी मुंबईहून फुलांचा माल खाली करून मालुंजे (ता. इगतपुरी) येथील पिकअप क्र. एमएच १५, जीव्ही ४६९४ ही गाडी बोरटेंभे परिसरात आली असता दुपारी तीन वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती महामार्गावरील रेल्वे पुलाचे संरक्षक कथडे तोडून थेट ३५ फूट खाली असलेल्या रेल्वे रूळावर आदळली.

Pune Crime: जेवायला जातो सांगून निघाला, परतलाच नाही, मित्र वाट बघत राहिले; अमरावतीच्या तरुणाचा पुण्यात मृत्यू
यावेळी येथे हजर असलेल्या ७ ते ८ रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत भुसावळहून इगतपुरीकडे जाणाऱ्या मेमू एक्सप्रेसला लाल झेंडा दाखवून थांबविल्यामुळे अनर्थ टळला. घटनास्थळी रेल्वे कर्मचारी, रेल्वे सुरक्षा पथक, लोहमार्ग पोलिस, इगतपुरी पोलिसांनी धाव घेऊन रेल्वे ट्रॅकवरील पिकअप बाजूला केली. या अपघातात दोघे जखमी झाले असून, त्यांना जगद्‌गुरू नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेतून इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी लोहमार्ग पोलीस अधिकारी सचिन बनकर यांच्यासह पोलीस कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बल अधिकारी तसेच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले.

Supreme Court: राहुल नार्वेकरांनी मविआची डोकेदुखी वाढवली; आमदारांच्या अपात्रतेबद्दल लंडनमधून प्रतिक्रिया देत म्हणाले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed