• Sun. Sep 22nd, 2024

Pune Crime: जेवायला जातो सांगून निघाला, परतलाच नाही, मित्र वाट बघत राहिले; अमरावतीच्या तरुणाचा पुण्यात मृत्यू

Pune Crime: जेवायला जातो सांगून निघाला, परतलाच नाही, मित्र वाट बघत राहिले; अमरावतीच्या तरुणाचा पुण्यात मृत्यू

पुणे: अमरावतीच्या एका तरुणाची पुण्यात हत्या करण्यात आली आहे. एका आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडल्याची माहिती आगे. याची माहिती पोलिसांना शनिवारी सकाळी १३ रोजी माहिती मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गौरव सुरेश उरावी (वय ३५, रा. खराडी, मूळगाव अमरावती) असे तरुणाचे नाव आहे. तो मूळचा अमरावती येथील आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेला मृतदेह आढळून आला. सोबत दुचाकी देखील मिळून आली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून लोणीकंद पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. घटनास्थळी न्याय वैद्यकीय पथक तसेच श्वानपथक यांना देखील पाचारण करण्यात आले होते.

पत्नीला संपवलं, पलंगात लपवलं; दोन दिवस त्याच पलंगावर झोपला… पण एक चूक अन् सारा डाव फसला
गौरव उरावी हा खराडी येथील आयटी कंपनीत नोकरीस होता. तसेच, तो खराडी येथे मित्रांसमवेत पीजीमध्ये राहत होता. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जेवायला जातो, असे मित्रांना सांगून गौरव निघाला होता. मात्र, रात्री पुन्हा तो आला नाही. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गौरवचा गळा चिरलेला मृतदेह सापडून आला. हा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

धुमधडाक्यात लग्न, दुसऱ्याच दिवशी नववधू खोलीतून ओरडत बाहेर आली, सत्य कळताच लग्नघरी सन्नाटा…
घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. गौरवचा अत्यंत अमानुषपणे गळा चिरून निर्घुणपणे खून का करण्यात आला याचा उलगडा पोलीस करीत आहेत.

मास्टरमाइंड पोलीस; गुन्हेगारांचा अचूक छडा लावणारे अजय जाधव यांचा सन्मान होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed