• Sun. Sep 22nd, 2024

शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांवर माया,उच्च शिक्षित अर्चनाताईंकडून आई होऊन ५० मुला-मुलींचा सांभाळ

शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांवर माया,उच्च शिक्षित अर्चनाताईंकडून आई होऊन ५० मुला-मुलींचा सांभाळ

पुणे : एखाद्या मुलीचं लग्नाचं झाल्यावर आपला सुखाचा संसार असावा, ऐशो आरमाचं आयुष्य असावं अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. मात्र एका आयटी इंजिनियरशी लग्न होऊन कोणतीही अपेक्षा न करता अर्चना देशमाने यांनी पतीसोबत संपूर्ण आयुष्य स्नेहवन या संस्थेतील मुलांचं जीवनमान उंचावण्यासाठी द्यायचं ठरवलं आहे. या स्नेहवनमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी, ऊसतोड कामगार, शेतमजूर, दुष्काळग्रस्त भागांतील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांची जबाबदारी अर्चना एकट्या उचलत आहेच. गेली सात ते आठ वर्षांपासून ५० मुलांची आई बनून त्यांचा सांभाळ करत आहे.या मुलांचं शिक्षण, संगोपनासाठी आणि शैक्षणिक त्याचबरोबर मुलांचा अभ्यास घेणं तसंच मुलांच्या पूर्नवसनाबरोबरच त्यांचा सांभाळ करण्याचं काम त्या करतात. त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक कठीण प्रसंग आले. त्यात त्यांच्या पहिल्या बाळंतपणात त्यांना त्यांचं मुल देखील गमावावं लागलं, पण त्यांनी नव्याने उभारी घेत येथील मुलांना आपलं मुल मानून त्यांची सेवा करण्याचं ठरवलं. उच्च शिक्षित असूनही अर्चना यांनी या सामजिक कार्यात स्वतःला झोकून दिलं आहे. या कामात त्यांचे पती देखील तितक्याच उत्सुकतेने त्यांना मदत करतात.

माझी बोटं लहान असल्यामुळे मला टायपिंगला त्रास व्हायचा, पूजाने नोकरी सोडून व्यवसाय केला

सध्या स्नेहवन मध्ये ५० निवासी मुलं असून खेड तालुक्यातील आळंदी जवळ असणाऱ्या कोयाळी फाटा येथे हे स्नेहवन आहे. एका कंपनीने या जोडप्याचं काम पाहून मुलांच्या आसऱ्यासाठी इमारत बांधून दिली आहे. ५० मुलांची आई होऊन त्यांचं संगोपन करणं, एकटीने एवढ्या मुलांचं जेवण तयार करणं, त्यांचा सांभाळ करणं हे सोपं काम नाही.

पतीचं निधन, सासरच्यांनीही साथ सोडली, कष्टाने लेकाला पोलीस अधिकारी केलं; रुक्मिणीताईंची प्रेरणादायी गोष्ट
एका मराठवाड्यात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील तरुणाने राज्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांमधील मुलामुलींना मोफत निवासासह शिक्षण देण्याचा निर्धार करत आळंदी येथील ‘स्नेहवन’ ही सामाजिक संस्था उभारली आहे. शेतकरी अशोक बाबाराव देशमाने या उच्चशिक्षित तरुणाने कष्टातून ही संस्था उभारली आहे. या संस्थेत त्यांनी पत्नीला सोबत घेऊन अशा मुलांचा सांभाळ करण्याचं ठरवलं आहे.

५० मुलांची आई होवून ते निभावणं, अशी भूमिका पार पाडत आयुष्यभर कोणतीही तक्रार करणार नाही, विशेष मुलांची जबाबदारी घेतली आहे. त्यापैकी २५ मुलांचे पालकत्व घेऊन त्यांचं शिक्षण, संगोपन केलं जातं. तसंच, नंदी समाजाच्या, स्नेहवनमधील कामगार आणि शेतकऱ्यांची मुलं आणि कचरा जमा करणाऱ्या मुलांची जबाबदारी घेतली आहे. त्यांची आई बनून २७ मुलींची जबाबदारीही घेतली असल्याचं अर्चना यांनी सांगितलं आहे.

घरची गरीब स्थिती, पतीचं निधन; धुणी-भांडी करत मुलांना शिकवलं, कोणाचीच साथ नसताना जिद्दीने घर सावरलं
या स्नेहवनमध्ये पहिल्यांदा फक्त मुलेच होती. मुलींना शिकवण्याची प्रेरणा अर्चना यांच्यामुळे मिळाली. कोणी महिला स्नेहवनमध्ये नसल्यामुळे मुलांचा सांभाळ करणं फार अवघड होतं. मात्र, अर्चनाशी लग्न झाल्यानंतर हे शक्य झालं. सर्व गोष्टी अर्चनाही पतीच्या खांद्याला खांदा लावून करत आहे. लग्न झाल्यापासून कुठे फिरायला जाणं, सिनेमा पाहणं, या गोष्टी वाट्याला आल्या नाहीत, असं अशोक देशमाने सांगतात. या स्नेहवन येथून शेतकरीपुत्रांना पहिली ते बारावीपर्यंत मोफत निवासी शिक्षणाची सुविधा मिळणार आहे. आता या स्नेहवनमध्ये १०० मुलांचा सांभाळ केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed