• Sat. Sep 21st, 2024

पोरांचं पितृछत्र हरपलं,हातात शंभर रुपये नाही;आनंदीताईंनी मोलमजुरी करुन हिमतीने संसार पेलला

पोरांचं पितृछत्र हरपलं,हातात शंभर रुपये नाही;आनंदीताईंनी मोलमजुरी करुन हिमतीने संसार पेलला

रत्नागिरी : घरची परिस्थिती बेताची दोन मुलींची लग्न झालेली. तीन लहान मुलं पदरात असतानाच पतीचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. मात्र यादेखील परिस्थितीत आनंदी काशीराम भांबीड या डगमगल्या नाहीत. घरचा संसार, शेतीवाडी सांभाळत, मोलमजुरी करत त्यांनी आपल्या दोन मुलं आणि मुलीला जमेल तसं शिक्षण दिलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखलगाव सारख्या ग्रामीण भागात २६ वर्षांपूर्वी कोणतीही दळणवळणाची, संपर्काची साधनंही नव्हती. पितृछत्र हरपल्याने सगळी जबाबदारी आनंदी यांच्यावर येऊन पडली. त्यावेळी हातात शंभर रुपये नव्हते आणि कोणाची साथही नव्हती. या परिस्थितीत मुलांचा सांभाळ करत पुढे त्यांचा संसार थाटून दिला.

तीन मैत्रिणींनी लग्नानंतर पाहिलं खाकीचं स्वप्न; संसार सांभाळून जिद्दीनं आज पोलिसात भरती

आज २६ वर्षानंतर सगळ्या मुलांचे संसार उत्तम चाललेले पाहून त्या समाधानी आहेत. सुना जावई, नातवंडं असा मोठा परिवार आहे. पतीचं निधन झालं, त्यावेळी एक मुलगा पहिलीत होता, तर दुसरा इयत्ता तिसरीमध्ये होता. भावंडांमध्ये सर्वात लहान असलेली सविता ही मुलगी एक वर्षाची होती. पतीच्या निधनानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. दोन मोठ्या मुलींच्या झालेल्या लग्नाचं कर्जही आनंदीबाईंच्या डोक्यावर होतं. पण पदरी असलेल्या मुलांना खाण्या-पिण्याची कसलीच आबाळ होऊ द्यायची नाही अशी जिद्द आनंदीबाईंनी बाळगली होती.

घरची गरीब स्थिती, पतीचं निधन; धुणी-भांडी करत मुलांना शिकवलं, कोणाचीच साथ नसताना जिद्दीने घर सावरलं
या ही परिस्थितीत त्यांना जमेल तसं शिक्षण द्यायचं असा त्यांचा प्रयत्न होता. स्वतःची शेती सांभाळत मोल – मजुरी करत या तिन्ही मुलांची शिक्षण इयत्ता सातवी पर्यंत पूर्ण केली. आपल्या घरची हलाखीची परिस्थिती पाहून दोन मुलांनी सातवीनंतर मुंबई येथे नशीब आजवण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. या परिस्थितीत अनेक अडचणी येऊनही या सगळ्यावर मात करत त्यांनी घरही बांधलं.

पतीचं निधन, सासरच्यांनीही साथ सोडली, कष्टाने लेकाला पोलीस अधिकारी केलं; रुक्मिणीताईंची प्रेरणादायी गोष्ट
पण आपण ज्या ज्या प्रसंगातून आजवर गेलो त्या वेळी आपल्याला कोणाचीच मदत नव्हती, कोणाचीही साथ मिळाली नाही अशी खंत आनंदीबाई व्यक्त करतात. आज त्यांच्या दोन्ही मुलांचं मुंबई गोरेगाव परिसरात स्वतःचं घर आहे. दोघांचेही संसार उत्तम सुरू असल्याचं आनंदीताईंना समाधान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed