• Tue. Mar 10th, 2026
    धगधगतं मावळ अन् पेटलेलं तळेगाव, आवारेंच्या खून प्रकरणात पोलिसांना मोठं यश

    पुणे : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तळेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटून आवारे खाली उतरले, मारेकरी दबा धरुनच बसले होते. आवारे जसे इमारतीबाहेर पडले, तसं हल्लेखोरांनी कोणताही पुढचा मागचा विचार न करता थेट गोळ्या झाडल्या. इतकंच काय ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही त्यांच्यावर कोयत्याने वार केले. ते मृत झाल्याची खात्री करुनच हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. आवारेंच्या घटनेने मावळमधील गुन्हेगारीने पुन्हा डोकं वर काढल्याची चर्चा सुरु झाली. आज संपूर्ण तळेगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. लोकांच्या संतप्त भावना होत्या. पोलिसांनी हेच लक्षात घेऊन तपासाची चक्रे वेगात फिरवली आणि २४ तासांच्या आत ५ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांची मोठी कारवाई

    किशोर आवारेंच्या खून प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके यांच्यासह ७ जणांविरोधात तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे सुनील शेळके यांनी मात्र पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. आम्ही राजकारणात काम करत असताना आमच्यात मतभेद होते पण मनभेद नव्हते, असं सांगताना आरोपींना कठोरात कठोर शासन करावं, अशी त्यांनी मागणी केलीये.

    जसं आवारेंना मारलं, तसं अण्णांच्या भावालाही संपवलं होतं, तो रक्तरंजित इतिहास पुन्हा ताजा
    प्रवीण उर्फ रघुनाथ धोत्रे, आदेश धोत्रे, शाम निगडकर (रा. तळेगाव) आणि नाना उर्फ संदीप विठ्ठल मोरे (रा. पंचतारामनगर, संभाजी चोक, गणेश मंदिराजवळ, आकुर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना आज वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर करण्यात आले. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक-२ च्या पोलिसांनी संदीप विठ्ठल मोरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

    अण्णांशी संघर्ष, भाऊंशी जवळीक, तळेगावात भल्याभल्यांना नडणाऱ्या किशोर आवारेंची गोष्ट
    आमदार सुनील शेळके काय म्हणाले?

    किशोर आवारे आणि मी राजकारणात एकत्र काम केलंय. आमच्यात मतभेद होते, पण मनभेद नव्हते. परंतु, काही मंडळी जाणीवपूर्व राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण न्यायदेवता आणि पोलीस सत्यता समाजासमोर आणतील. मी, माझा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा या खून प्रकरणात आरोप आहे. एखाद्याची हत्या झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या भावना तीव्र असतात. मला हे माहिती आहे. पण यामागे कोण सूत्रधार आहे, हे सगळं कोण घडवत आहेत, याचा शोध आम्ही घेऊ, असं सुनील शेळके म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed